अजितदादांसोबत OSD का नव्हता? दादांची ओळख बनलेलं घड्याळ कुठं गेलं? मला घातपाताची शंका; मिटकरींचे 7 मोठे प्रश्न
Amol Mitkari on Ajit Pawar death and Baramati plane Crash : "अपघातानंतर विमातळावर जी कागदपत्र पडली, ती देखील कुठेच जळताना दिसली नाहीत. अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी त्या स्पॉटवर गेलो होतो. मी बारकाईने निरीक्षण केलं. कागद जळालेला दिसत नाही. शिवाय, अजितदादांची बॉडी हातातील घड्याळामुळे ओळखता आली. जे घड्याळ अजितदादांचं शेवटची ओळख बनलं, ते घड्याळ कुठं गेलं? याबाबतही कोणी खुलासा देण्यास तयार नाही. कारण ती त्या बॉडीच्या हातात नव्हती"
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजितदादांसोबत OSD का नव्हता? दादांची ओळख बनलेलं घड्याळ कुठं गेलं?
मला घातपाताची शंका; मिटकरींचे 7 मोठे प्रश्न
Amol Mitkari on Ajit Pawar death and Baramati plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा बारामती येथे 28 जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल शंका व्यक्त केली होती. मात्र, खासदार शरद पवारांनी हा अपघातच आहे, असं ठणकावून सांगितलं होतं. दरम्यान, विमान अपघातानंतर चार दिवसांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांसोबत घातपात झाल्याच्या शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्याबाबतही भाष्य केलंय. ते न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. अमोल मिटकरी यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत? जाणून घेऊयात..
EASA ने बंदी घातलेलं विमान अजितदादांना का दिलं गेलं? - मिटकरी
अमोल मिटकरी म्हणाले, EASA ज्या विमान कंपनीवर बंदी आणली होती. याबाबत 5 वेळा स्मरणपत्र पाठवण्यात आली होती. विमानावर बंदी घातल्याचा प्रस्ताव युरोपियन UNION ने DGCA कडे पाठवला होता. मग असं असताना अजित पवारांसाठी हेच विमान का दिल्या गेलं?
दादांची ओळख बनलेलं घड्याळ कुठं गेलं?
अपघातानंतर विमातळावर जी कागदपत्र पडली, ती देखील कुठेच जळताना दिसली नाहीत. अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी त्या स्पॉटवर गेलो होतो. मी बारकाईने निरीक्षण केलं. कागद जळालेला दिसत नाही. शिवाय, अजितदादांची बॉडी हातातील घड्याळामुळे ओळखता आली. जे घड्याळ अजितदादांचं शेवटची ओळख बनलं, ते घड्याळ कुठं गेलं? याबाबतही कोणी खुलासा देण्यास तयार नाही. कारण ती त्या बॉडीच्या हातात नव्हती.
मेडे कॉल का केला नाही? विमान पुण्याला किंवा सोलापूरला लँड का केलं नाही?










