Maharashtra crisis: राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर बोट, कोर्टात काय घडलं?

मुंबई तक

Maharashtra political crisis Latest News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असून, पाच सदस्यीय घटनापीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाने (Thackeray) नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांच्या कार्यपद्धतीचा मुद्दा उपस्थित केला. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil Sibbal) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra political crisis Latest News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असून, पाच सदस्यीय घटनापीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाने (Thackeray) नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांच्या कार्यपद्धतीचा मुद्दा उपस्थित केला. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil Sibbal) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यावर विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांनी त्यांची बाब स्पष्ट केली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी झाली.

ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला, तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांनी केला. विधानसभा अध्यक्षांच्या वतीने एन.के. कौल यांनी बाजू मांडली.

एकनाथ शिंदेंसह बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीचा मुद्दा मांडला. सिब्बल म्हणाले की, “या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेलेला नाहीये. तरीही आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणताही निर्णय 8 महिने होऊनही घेण्यात आलेला नाही. अपात्रतेची कारवाई करण्याच्या आमच्या याचिकेवर नव्या विधानसभा अध्यक्षांनी नोटीसही दिली नाही,” असं सिब्बल म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp