औरंगाबादचं संभाजीनगर व्हायला अजून किती काळ लागेल?, काय आहे पुढची प्रक्रिया?
पायउतार होण्याआधी ठाकरे सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यातील दोन निर्णय होते नामांतराचे. औरंगाबादचं संभाजीनगर, तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याला मंजुरी देण्यात आली. याबद्दल उद्धव ठाकरेंचं कौतूकही होतंय. सरकारने मंजुरी दिली असली, तरी दोन्ही शहरांचं नामांतर होण्यासाठी अजून प्रक्रियेची बरीच मोठी शर्यत पार करावी लागणार आहे. औरंगाबाद शहराला संभाजीनगर असं नाव देण्याची मागणी बरीच […]
ADVERTISEMENT

पायउतार होण्याआधी ठाकरे सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यातील दोन निर्णय होते नामांतराचे. औरंगाबादचं संभाजीनगर, तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याला मंजुरी देण्यात आली. याबद्दल उद्धव ठाकरेंचं कौतूकही होतंय. सरकारने मंजुरी दिली असली, तरी दोन्ही शहरांचं नामांतर होण्यासाठी अजून प्रक्रियेची बरीच मोठी शर्यत पार करावी लागणार आहे.
औरंगाबाद शहराला संभाजीनगर असं नाव देण्याची मागणी बरीच जुनी आहे. याच मागणीवरून गेली अडीच वर्ष शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. तीन वेगवेगळ्या पक्षाचं मिळून सरकार असताना हा निर्णय होईल का, याची शक्यता कमीच होती. पण, जाता जाता महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याला मंजुरी दिली. आता पुढे काय होणार हा प्रश्नचिन्ह कायम आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला पुन्हा एकदा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागणार आहे. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला तरी नामांतराला मंजुरी द्यायची का? कधी द्यायची हा सर्वस्वी निर्णय केंद्राचा असणार आहे.
कशी असते नामांतराची प्रक्रिया?