महाराष्ट्रात 1 मेनंतर Lockdown वाढणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

मुंबई तक

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. भाजीपाला, इतर दुकानं ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सध्या राज्यात सुरू आहेत. अशात हे निर्बंध 1 मेनंतर उठवले जातील का? असा प्रश्न […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. भाजीपाला, इतर दुकानं ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सध्या राज्यात सुरू आहेत. अशात हे निर्बंध 1 मेनंतर उठवले जातील का? असा प्रश्न इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला त्यावर राजेश टोपे यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे.

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे?

मुंबई आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी केसेस कमी होत आहेत. लॉकडाऊनच्या संदर्भात 30 एप्रिलला निर्णय घेतला जाईल. कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात येत असेल तर लॉकडाऊन वाढवला जाणार नाही मात्र संख्या नियंत्रणात येत नाही असं दिसून आलं तर मात्र लॉकडाऊन काही दिवसांसाठी वाढवला जाईल. 30 एप्रिलला हा निर्णय होईल. माननीय मुख्यमंत्री कॅबिनेटला विचारात घेऊन हा निर्णय घेत असतात. कोरोना रूग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसला तर लॉकडाऊन वाढवावाच लागेल. मात्र तो खाली येताना दिसला तर काही निर्बंध शिथील करण्यात येतील असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातला Lockdown वाढणार का? जाणून घ्या उत्तर

हे वाचलं का?

    follow whatsapp