राज्यात कोरोनाचं थैमान कायम, पाहा गेल्या २४ तासात किती पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही अटोक्यात येत नसल्याचं दिसून येतंय. कारण आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल ४७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात ४७ हजार २८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर १५५ पॉझिटिव्ह रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे. या सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे सध्या राज्यात साडेचार लाखांहून […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही अटोक्यात येत नसल्याचं दिसून येतंय. कारण आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल ४७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात ४७ हजार २८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर १५५ पॉझिटिव्ह रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे. या सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे सध्या राज्यात साडेचार लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. हे कठोर निर्बंध आज (५ एप्रिल) रात्री ८ वाजेपासून लागू झाले आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी जवळपास बंद असणार आहेत.
दरम्यान, राज्यात आज २६,२५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २५,४९,०७५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.३६ टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात १५५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.८३ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रामध्ये लॉकडाउनच ! खासगी कार्यालयं-हॉटेल ते लग्नसोहळ्यांसाठी कडक निर्बंध लागू










