Uddhav Thackeray यांना निकालाची कुणकुण लागली? जनतेशी संवाद साधत म्हणाले…
Uddhav Thackeray | Election Commission : मुंबई : कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. पक्ष फक्त निवडून आलेल्या व्यक्तींवर अवलंबून नसतो. निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांवर पक्ष म्हणून मान्यता मागितली तर उद्या कोणीही उद्योगपती पक्ष आणि आमदार विकत घेतील आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान होतील, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray | Election Commission :
मुंबई : कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. पक्ष फक्त निवडून आलेल्या व्यक्तींवर अवलंबून नसतो. निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांवर पक्ष म्हणून मान्यता मागितली तर उद्या कोणीही उद्योगपती पक्ष आणि आमदार विकत घेतील आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान होतील, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. (Maharashtra shiv sena Uddhav Thackeray press conference on election commission-result-in-Mumbai)
शिवसेनेचं काय होणार? नाव, चिन्ह नेमकं कोणाला मिळणार? याबद्दलचा खटला निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून निवडणूक आयोग कधीही निकाल देऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (८ फेब्रुवारी) उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगातील आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत माहिती दिली.
Mumbai Airport : राहुल गांधींच्या आरोपांनंतर GVK च्या उपाध्यक्षांचा मोठा दावा