Maharashtra violence : अमरावतीत पुन्हा हिसेंचा भडका; दगडफेक-जाळपोळ, संचारबंदी लागू
महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. त्रिपुरातील घटनेच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या असून, महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये हिसेंचा उद्रेक झाला. दरम्यान, अमरावतीत आजही (13 नोव्हेंबर) हिंसक घटना घडल्या असून, दगडफेक, तोडफोड करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्रिपुरातील हिंसचाराच्या विरोधात शुक्रवारी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंद दरम्यान, महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. त्रिपुरातील घटनेच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या असून, महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये हिसेंचा उद्रेक झाला. दरम्यान, अमरावतीत आजही (13 नोव्हेंबर) हिंसक घटना घडल्या असून, दगडफेक, तोडफोड करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
त्रिपुरातील हिंसचाराच्या विरोधात शुक्रवारी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंद दरम्यान, महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेडात हिंसाचाराचा उद्रेक झाला. नांदेड, अमरावती, मालेगावात जमावाने दुकानांची आणि सार्वजनिक मालमत्तांची तोडफोड केली. त्यामुळे तिन्ही शहरात तणाव पसरला आहे.
अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची तोडफोड आणि दगडफेक
अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचे शनिवारीही पडसाद उमटले. जमावाकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. यावेळी शहरातील राजकमल चौकात दोन्ही बाजूचे जमाव आमने-सामने आला. यावेळी अनियंत्रित झालेल्या दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.