राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना फोन : शाईफेक प्रकरणातील ११ पोलीस अन् संशयितांना दिलासा
मुंबई : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक हल्ल्यात निलंबित करण्यात आलेल्या ११ पोलिसांना आणि संशयितांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी ठरली असून ११ पोलिसांचं निलंबन मागे घेण्यात येणार आहे. तसंच संशयितांवर लावण्यात आलेलं ३०७ हे सदोष मनुष्यवधाचं कलमही शिथिल करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः राज […]
ADVERTISEMENT

मुंबई : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक हल्ल्यात निलंबित करण्यात आलेल्या ११ पोलिसांना आणि संशयितांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी ठरली असून ११ पोलिसांचं निलंबन मागे घेण्यात येणार आहे. तसंच संशयितांवर लावण्यात आलेलं ३०७ हे सदोष मनुष्यवधाचं कलमही शिथिल करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः राज ठाकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे.
काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी पत्रात?
सस्नेह जय महाराष्ट्र,
लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण ‘मनसे स्टाईल’ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण हे करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून, स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत. मग ह्यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात.
असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्या बाबतीत घडला. एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. एक बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलीस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या ११ पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम ३०७ देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे. हे सगळं जेंव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो.










