Local Body Elections: ‘…तर तुमचा पराभव निश्चित’; मोरे, देशपांडे संतापले
Municipal Corporation and Local Body Elections in Maharashtra : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडल्या आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. लांबत चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबद्दल मनसे नेते आता आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी […]
ADVERTISEMENT

Municipal Corporation and Local Body Elections in Maharashtra : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडल्या आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. लांबत चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबद्दल मनसे नेते आता आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरच वार केलाय.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील बहुतांश महापालिकांची मुदत संपलेली आहे. याठिकाणी प्रशासक असून, निवडणुका कधी होणार? याबद्दलची अनिश्चितता कायमच आहे. लांबत चाललेल्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता असून, मनसेतून आता यावर थेटपणे भूमिका मांडण्यात आलीये.
महापालिका निवडणुका : वसंत मोरे काय म्हणाले?
मनसेचे सरचिटणीस वसंत मोरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलीये. त्यात मोरे म्हणाले,”माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे 2 आमदार नुकतेच मयत झाले. अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या”, अशा संतप्त भावना मोरेंनी व्यक्त केल्या.
Thane: राष्ट्रवादीला खिंडार! जगदाळेंसह 5 माजी नगरसेवक जाणार शिंदे गटात