शेतकरी हिंसक झाल्यास मोदी सरकार जबाबदार-शरद पवार

मुंबई तक

आत्तापर्यंत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र यापुढे जर शेतकरी हिंसक झाले तर त्याची सगळी जबाबदारी भाजप सरकारची असेल अशा शब्दात मोदी सरकारवर शरद पवार यांनी टीका केली आहे. 70 दिवसांपासून जास्त काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे असंही शरद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आत्तापर्यंत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र यापुढे जर शेतकरी हिंसक झाले तर त्याची सगळी जबाबदारी भाजप सरकारची असेल अशा शब्दात मोदी सरकारवर शरद पवार यांनी टीका केली आहे. 70 दिवसांपासून जास्त काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ या मुद्द्यांवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

सर्वसामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसला आहे. या समस्या कशा वाढतील याकडे मोदी सरकार लक्ष देतं आहे. पेट्रोलियम पदार्थांवर जास्त उत्पन्न घेतलं जातं आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे जनता नाराज आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

हे वाचलं का?

    follow whatsapp