Monsoon onset in Kerala: पावसाचं देवभूमीत पाऊल! महाराष्ट्रात लवकरच होणार दाखल

मुंबई तक

तिरुअनंतपूरम: मान्सूनबहवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आहे. आज 29 मे रोजी मान्सून भारताच्या देवभूमीत म्हणजेच केरळमध्ये दाखल झाला आहे. IMD नुसार, मान्सूनने केरळमध्ये सामान्य वेळेपेक्षा 3 दिवस आधीच धडक दिली आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आता येत्या काही दिवसांत केरळच्या उर्वरित भागासह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होत हळूहळू पुढे सरकेल. बंगालच्या उपसागरात ‘आसानी’ या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

तिरुअनंतपूरम: मान्सूनबहवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आहे. आज 29 मे रोजी मान्सून भारताच्या देवभूमीत म्हणजेच केरळमध्ये दाखल झाला आहे. IMD नुसार, मान्सूनने केरळमध्ये सामान्य वेळेपेक्षा 3 दिवस आधीच धडक दिली आहे

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आता येत्या काही दिवसांत केरळच्या उर्वरित भागासह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होत हळूहळू पुढे सरकेल. बंगालच्या उपसागरात ‘आसानी’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या वेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तवला होता.

मान्सून 16 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेच्या खूप आधी पोहोचला होता आणि चक्रीवादळाच्या उर्वरित प्रभावामुळे तो पुढे जाण्याची अपेक्षा होती आणि तसंच होत असताना आता दिसत आहे.

मान्सून 16 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेच्या खूप आधी पोहोचला होता आणि चक्रीवादळाच्या उर्वरित प्रभावामुळे तो पुढे जाण्याची अपेक्षा होती आणि तसंच होत असताना आता दिसत आहे.

हे वाचलं का?