शरद पवार आणि राज ठाकरेंचं एकमत… पण कोणत्या गोष्टीवर?

मुंबई तक

मुंबई: ‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली हा कट कुणाचा, यामागे कोण आहे? हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाही. त्यामुळे त्याचीच सखोल चौकशी झाली पाहिजे.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल (21 मार्च) मनसे अध्यक्ष राज ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली हा कट कुणाचा, यामागे कोण आहे? हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाही. त्यामुळे त्याचीच सखोल चौकशी झाली पाहिजे.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल (21 मार्च) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील याच मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. अंबानींच्या घराखाली गाडी कुणाच्या सांगण्यावरुन शोधण्यात आली हे शोधणं गरजेचं आहे. असं राज ठाकरे देखील म्हणाले होते. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी राज ठाकरे इतर कोणत्याही विषयावर जास्त भाष्य केलं नव्हतं.

मोठी बातमी: …आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पवारांकडून क्लीन चीट

आता राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवार यांनी देखील हाच मुद्दा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता त्यासंबंधी अधिक काही माहिती समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Mukesh ambani bomb scare case is an important issue the consensus of raj thackeray and sharad pawar)

हे वाचलं का?

    follow whatsapp