नवाब मलिकांनी स्वीकारलं फडणवीसांचं आव्हान, प्रत्युत्तर देत म्हणाले…

मुंबई तक

मुंबई ड्रग्ज प्रकरणात आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी काही थांबताना दिसत नाहीयेत. आर्यन खान जामिनावर सुटून घरी गेला. मात्र आरोपांच्या फैरी काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. आज नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई ड्रग्ज प्रकरणात आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी काही थांबताना दिसत नाहीयेत. आर्यन खान जामिनावर सुटून घरी गेला. मात्र आरोपांच्या फैरी काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. आज नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला मी मात्र दिवाळीनंतल बॉम्ब फोडणार आहे असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या इशाऱ्याला नवाब मलिक यांनी तीन शब्दात उत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचं हे आव्हान स्वीकारलं असून ‘है तय्यार हम’ असं तीन शब्दांमध्ये ट्विट करत चॅलेंज स्वीकारल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर काय राजकीय फटाके फुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मलिकांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

हे वाचलं का?

    follow whatsapp