NCP: ‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही’, राष्ट्रवादीने ‘तो’ व्हीडिओ का केला शेअर?

मुंबई तक

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. गेले अनेक महिने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांना ईडीकडून सातत्याने समन्स धाडले जात आहेत. तर काही जणांना चौकशीसाठी देखील बोलावलं जात आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादीने भाजपला बरोबर 2 वर्षांपूर्वीच्या दिवसाची आठवण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. गेले अनेक महिने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांना ईडीकडून सातत्याने समन्स धाडले जात आहेत. तर काही जणांना चौकशीसाठी देखील बोलावलं जात आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादीने भाजपला बरोबर 2 वर्षांपूर्वीच्या दिवसाची आठवण करुन दिल्ली आहे.

‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकत नाही’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपविरोधात रणशिंग फुकलं होतं. ईडीकडून पवारांना पाठविण्यात आलेल्या समन्सनंतर स्वत: पवारांनी बरोबर आजच्याच दिवशी (27 सप्टेंबर 2019) आपण स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहू असं जाहीर केलं होतं. ज्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघालं होतं.

‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?

महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजप एकहाती सत्ता मिळवेल असं सातत्याने म्हटलं जात होतं. किंबहुना भाजपकडून तसा प्रचार देखील सुरु होता. असं असताना भाजपने आपल्या सर्व विरोधकांना नामोहरम करण्यास सुरुवात केली होती. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या सगळ्याचा कळस म्हणजे याच दरम्यान, शरद पवार यांना ईडीने एका प्रकरणात समन्स बजावलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp