आता हे सूत्र तरी कायम ठेवा! म्हणत देवेंद्र फडणवीसांनी दिला ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. अँटेलिया प्रकरणातला सचिन वाझेंचा सहभाग. मनसुख हिरेन यांची हत्या, त्यावरून झालेले आरोप. त्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेला लेटरबॉम्ब. तसंच रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून पोलीस बदल्यांचं रॅकेट उघड करत सरकारवर झाडलेल्या आरोपांच्या फैरी.. हे सगळं असलं तरी आता कोरोनाचं टेस्टिंग ठाकरे सरकारने वाढवलं आहे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. अँटेलिया प्रकरणातला सचिन वाझेंचा सहभाग. मनसुख हिरेन यांची हत्या, त्यावरून झालेले आरोप. त्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेला लेटरबॉम्ब. तसंच रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून पोलीस बदल्यांचं रॅकेट उघड करत सरकारवर झाडलेल्या आरोपांच्या फैरी.. हे सगळं असलं तरी आता कोरोनाचं टेस्टिंग ठाकरे सरकारने वाढवलं आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सल्लाही दिला आहे.

अधिवेशन गाजवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची गोष्ट!

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ?

चाचण्या वाढवणं हाच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या एक लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची वाट बघावी लागली.

हे वाचलं का?

    follow whatsapp