PM मोदी लोकसभेत फक्त काँग्रेसवरच बरसले, पण अदाणींवर…

मुंबई तक

Prime minister Narendra Modi Speech : पंतप्रधान (Narendra Modi) मोदी संसदेत (Assembly) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण दिले. लोकसभेत पीएम मोदी म्हणाले, ‘काल मी पाहत होतो की काही लोकांच्या भाषणाने संपूर्ण इकोसिस्टीम उसळत होती.’ पंतप्रधान म्हणाले, विरोधकांची द्वेषाची भावना बाहेर आली आहे. पीएम मोदी म्हणाले, देशातील काही लोक निराशेत बुडाले आहेत, त्यांना देशाची प्रगती स्वीकारता येत नाही. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Prime minister Narendra Modi Speech : पंतप्रधान (Narendra Modi) मोदी संसदेत (Assembly) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण दिले. लोकसभेत पीएम मोदी म्हणाले, ‘काल मी पाहत होतो की काही लोकांच्या भाषणाने संपूर्ण इकोसिस्टीम उसळत होती.’ पंतप्रधान म्हणाले, विरोधकांची द्वेषाची भावना बाहेर आली आहे. पीएम मोदी म्हणाले, देशातील काही लोक निराशेत बुडाले आहेत, त्यांना देशाची प्रगती स्वीकारता येत नाही. मात्र संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदींनी केवळ आणि केवळ काँग्रेसला टार्गेट केलं. त्यांनी अदाणींबाबत एकही शब्द यावेळी उच्चारला नाही. Prime Minister Narendra Modi Targeted On Congress

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशाच्या उपलब्धी तर मोजल्याच, पण विरोधकांवरही निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, आज संपूर्ण जगात भारताबद्दल सकारात्मकता, आशा, विश्वास आहे. आज भारताला G20 चे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, ही आनंदाची बाब आहे. ही देशासाठी आणि 140 कोटी देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, परंतु मला वाटते की काही लोक यामुळे दुःखी असतील. ते कोण आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे.

निराशावादी लोक या देशाची प्रगती स्वीकारण्यास तयार नाहीत
भारतात नवीन शक्यता असल्याचे पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितले. अनेकांना हे समजायला थोडा वेळ लागेल, पण पुरवठा साखळीच्या बाबतीत भारत पुढे गेला आहे. भारत एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित होत आहे. भारताच्या समृद्धीत जगाला त्याची भरभराट दिसत आहे. निराशेच्या गर्तेत बुडलेल्या काही लोकांना या देशाची प्रगती मान्य नाही. 140 कोटी देशवासीयांचे कष्ट आणि परिश्रम त्यांना पाहवत नाही.

‘स्टार्टअपमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे’
पंतप्रधान म्हणाले, गेल्या नऊ वर्षांत भारतात 90 हजार स्टार्टअप आले आहेत. आज आपण स्टार्टअप्सच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. देशातील टियर-3 शहरांमध्ये मोठी स्टार्टअप इकोसिस्टम पोहोचली आहे. इतक्या कमी वेळात आणि कोरोनाच्या गंभीर काळात 108 युनिकॉर्न तयार झाले. युनिकॉर्न म्हणजे त्याची किंमत सहा-सात हजार कोटींहून अधिक आहे. आज भारत मोबाईल बनवणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या बाबतीत आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत.

हे वाचलं का?

    follow whatsapp