अजित पवार संतापले… काढलं संजय राठोडांना अडचणीत आणणारं प्रकरण

मुंबई तक

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आमदार नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी उपस्थित केला. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं. दिशा सालियन प्रकरण : देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले? प्रचंड गदारोळात काम सुरू झालं. गोंधळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आमदार नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी उपस्थित केला. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

दिशा सालियन प्रकरण : देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

प्रचंड गदारोळात काम सुरू झालं. गोंधळ सुरूच राहिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं की, ‘मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण आधीपासून आहे. यासंदर्भातील ही जी मागणी आहे, निश्चितपणे जे काही पुरावे ज्यांच्याजवळ असतील, ते त्यांनी द्यावेत. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल.’

देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. ‘प्रश्नोत्तराच्या तासापासून सत्ताधारी पक्षाचे सदस्य हे वेगवेगळी चर्चा करत होते. आधी तालिका अध्यक्ष बसलेले होते. त्यावेळी मी, भास्करराव जाधव हात करत होतो. त्यांना बोलू दिलं, तर आम्हालाही बोलू द्या. प्रत्येकाला इथे बोलण्याचा अधिकार आहे. दिशा सालियनच्या मृत्यू संदर्भातील चर्चा काही सदस्यांनी उपस्थित केली. त्यांचा तो अधिकार आहे. खरंतर आपल्याला माहिती आहे की, यात कुणीही राजकीय अंगाने बघू नये,’ असं अजित पवार म्हणाले.

Disha Salian Death ची फाईल उघडली, गदारोळानंतर फडणवीसांची मोठी घोषणा

हे वाचलं का?

    follow whatsapp