रुप मनोहर… विठुरायाची महापूजा संपन्न, माघ यात्रा भाविकांविना

मुंबई तक

पंढरपूर: पंढरपूरच्या चार प्रमुख यात्रांपैकी असणारी माघी यात्रा आज (23 फेब्रुवारी) ही भाविकांनाविना पार पडली. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूरसह 10 गावांमध्ये संचारबंदी जाहीर केली असल्याने वारकरी भाविकांना घरी राहूनच आपल्या विठूरायाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यात्रा कालावधीसाठी पंढरपूरसह 10 गावांसमध्ये संचार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पंढरपूर: पंढरपूरच्या चार प्रमुख यात्रांपैकी असणारी माघी यात्रा आज (23 फेब्रुवारी) ही भाविकांनाविना पार पडली. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूरसह 10 गावांमध्ये संचारबंदी जाहीर केली असल्याने वारकरी भाविकांना घरी राहूनच आपल्या विठूरायाचं दर्शन घ्यावं लागणार आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यात्रा कालावधीसाठी पंढरपूरसह 10 गावांसमध्ये संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट निर्मनुष्य पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी हरिनामाचा जयघोष होतो, लाखोंच्या संख्याने वारकरी भाविक दाखल होतात तेथे फक्त पोलीस बंदोबस्त सध्या पाहायला मिळत आहे.

विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

हे वाचलं का?