‘…यासाठी माझ्या कुटुंबाने जीव दिलाय’; मोदींची हिटलरशी तुलना, RSS चा उल्लेख, राहुल गांधी काय म्हणाले?
महागाई, बेरोजगारीसह देशातील विविध मुद्द्यांवर काँग्रेसकडून देशभरात आंदोलन केलं जात असून, आंदोलनाला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर प्रहार केला. आरएसएसच्या विचारधारेला विरोध करणं हे माझं कर्तव्य असून, मी तो करत राहिन, अशी भूमिका राहुल गांधी मांडली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवर भाष्य केलं. राहुल गांधी काय म्हणाले? पत्रकार […]
ADVERTISEMENT

महागाई, बेरोजगारीसह देशातील विविध मुद्द्यांवर काँग्रेसकडून देशभरात आंदोलन केलं जात असून, आंदोलनाला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर प्रहार केला. आरएसएसच्या विचारधारेला विरोध करणं हे माझं कर्तव्य असून, मी तो करत राहिन, अशी भूमिका राहुल गांधी मांडली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवर भाष्य केलं.
राहुल गांधी काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “लोकांच्या मुद्द्यांवर मी जितका आवाज उठवेन, तितके माझ्यावर हल्ले होतील. मी महागाई, बेरोजगारी हे मुद्द्यांवर बोलेन तितके हल्ले माझ्यावर होतील. जो धमकावत आहे, तो घाबरतो. देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला ते घाबरत आहे. त्यांनी लोकांना आश्वासनं दिली होती, पण पूर्ण केली नाहीत, त्यामुळे ते घाबरत आहे. महागाईला घाबरतात, बेरोजगारीला घाबरतात. जनतेच्या शक्तीला घाबरतात, कारण खोटं बोलतात. २४ तास हे लोक खोटं बोलत असतात. महागाई नाही, बेरोजगारी नाहीये, चीनने घुसखोरी केलेली नाही असं खोटं बोलतात.
राजकीय पक्षांना घाबरण्याचे प्रयत्न होत आहे, तेच आता काँग्रेससोबत आणि सोनिया गांधींसोबत होत आहे. त्याचा सामना कसा करणार? असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “कसलीच भीती नाहीये. सामना करण्याचा प्रश्नच नाही. कुणाला घाबरायचं आहे.”
ईडी अधिकाऱ्यांना जाऊन विचारा- राहुल गांधी
“जितके मी लोकांचे मुद्दे उचलून धरेन, तितके माझ्यावर हल्ले होतील. अशा राजकीय हल्ल्यांमधून शिकतो. मला त्याचा फायदा. राजकीय विरोधक जेव्हा असे हल्ले करतात, तेव्हा मला आनंद होतो. कारण मला माझी विचाराधारा आणखी समजते. ज्या ईडी अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केलीये. त्यांना जाऊन विचारा, त्या खोलीत काय झालं हे ते तुम्हाला सांगतील,” असं राहुल गांधी म्हणाले.
भारतात लोकशाही राहिलेली नाही; राहुल गांधींची टीका
“भारतात कुणीही व्यक्ती मग तो कुठल्या राजकीय पक्षाचा असो, सेलिब्रिटी असो जर तो सरकारविरोधात बोलला, तर त्याच्याविरोधात सर्व सरकारच्या यंत्रणा त्याच्यामागे लागतात. मी आधीच सांगितलंय, पुन्हा सांगतोय भारतात लोकशाही राहिलेली नाही. संपली आहे. भारतात लोकशाही ही केवळ स्मृतींपुरतीच राहिली आहे. जे घटनाक्रम सुरु आहेत, त्यातून इतकंच दिसतंय की भारतातील लोक आता शांत बसणार नाहीत”
नरेंद्र मोदी तुम्हाला घाबरवत आहेत का?; राहुल गांधी काय म्हणाले?
“आरएसएसच्या विचारधारेला रोखणं हेच माझं कर्तव्य आहे आणि मी ते करतोय. मी जितका विरोध करेन, तितकं मला लक्ष्य केलं जाईल. तितकं हल्ले माझ्यावर होतील, तितका मला आनंद आहे.”
नरेंद्र मोदी तुम्हाला घाबरवत आहेत का? या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, “कसलीही भीती नाहीये. ते घाबरवण्याचे प्रयत्न करतील. करत राहू द्या. त्याने काहीही होणार नाही. ते गांधी कुटुंबाला हल्ले का करतात? कारण आम्ही एका विचारधारेसाठी लढतो. आमच्यासारखे देशात कोट्यवधी लोक आहेत. आम्ही लोकशाहीसाठी लढतो. आम्ही सामाजिक सौहार्दतेसाठी लढतो. वर्षांनुवर्ष लढतोय. हे फक्त मीच केलेलं नाहीये. यासाठी माझ्या कुटुंबाने जीव दिला आहे. हे आमचं कर्तव्य आहे. कारण आम्ही या विचाराधारासाठी लढतोय. जेव्हा हिंदू-मुस्लिमांना लढवलं जातं. देशात फूट पाडली जाते, तेव्हा आम्हाला त्रास होतो. जेव्हा कुणाला दलित म्हणून मारलं जातं, तेव्हा आम्हाला त्रास होतो. जेव्हा कुठल्या महिलेला मारहाण केली जाते, तेव्हा आम्हाला त्रास होतो आणि म्हणून आम्ही लढतो. हे एक कुटुंब नाहीये, ही एख विचाराधारा आहे.”
ईडीच्या कारवाईवरून राहुल गांधींनी मोठा आरोप केला. “आज देशातील सर्वच्या सर्व संस्था या आरएसएस-भाजपच्या ताब्यात आहेत. एकही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे विरोधकांच्या संस्था नाही. विरोधकांवर हल्ले होत आहे,” असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर टीकास्त्र डागलं.
हिटरलही निवडणुका जिंकायचा म्हणत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
लोकशाहीत निवडणुका सर्वात महत्त्वाच्या असतात, असं भाजपकडून सांगितलं जातं, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “हिटरलही निवडणूक जिंकायचा. हिटरल निवडणूक कशी जिंकायचा. जर्मनीतील सर्व संस्था हिटलरच्या हातात होत्या. त्याच्याजवळ निमलष्करी दल होतं. हिटलरजवळ सर्व यंत्रणा होत्या. सर्व यंत्रणा माझ्या हाती द्या, निवडणुका कशा जिंकल्या जातात, मी दाखवून देतो,” असं राहुल गांधी म्हणाले.