दिवसभरात कधीही भोंग्यांवरून बांग दिली तर हनुमान चालीसा वाजणारच, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई तक

मुंबईत आज १ हजारांपेक्षा जास्त मशिदींनी बांग दिली नाही. मात्र १३५ मशिदींनी पहाटे पाचच्या आधी बांग दिली होती. त्यांच्यावर हे सरकार कारवाई करणार का? आणि काय कारवाई करणार असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. आमचं आंदोलन अद्याप संपलेलं नाही. पहाटेच नाही तर दिवसभरात कधीही बांग दिली तरीही हनुमान चालीसा लावणारच असा इशाराही राज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत आज १ हजारांपेक्षा जास्त मशिदींनी बांग दिली नाही. मात्र १३५ मशिदींनी पहाटे पाचच्या आधी बांग दिली होती. त्यांच्यावर हे सरकार कारवाई करणार का? आणि काय कारवाई करणार असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. आमचं आंदोलन अद्याप संपलेलं नाही. पहाटेच नाही तर दिवसभरात कधीही बांग दिली तरीही हनुमान चालीसा लावणारच असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनाची पुढची भूमिका स्पष्ट केली. मुंबईतल्या १३५ मशिदींवर काय कारवाई करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले की आमचं आंदोलन अद्याप संपलेलं नाही. जर दिवसभरातल्या कोणत्याही वेळी बांग दिली गेली तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवली जाणारच लक्षात ठेवा असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. हा विषय एक दिवसाचा नाही. ४ मे संपल्यावर आंदोलन संपलं असं नाही हे रोज सुरू राहणार आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

हे वाचलं का?

    follow whatsapp