राज ठाकरेंच्या भाषणातलं ‘हेच ते’ वक्तव्य ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा झाला दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेतली. या सभेची चर्चा आणि त्यावर उमटणारे पडसाद अजूनही संपलेले नाहीत. राज ठाकरेंवर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी शरद पवारांवर कडाडून टीका केली. शरद पवार जातीयवादी असल्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद वाढल्याचंही ते […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेतली. या सभेची चर्चा आणि त्यावर उमटणारे पडसाद अजूनही संपलेले नाहीत. राज ठाकरेंवर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी शरद पवारांवर कडाडून टीका केली. शरद पवार जातीयवादी असल्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद वाढल्याचंही ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणाच्या वेळी अजान सुरू झाली होती. त्यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं हे वक्तव्य काय होतं? ते आपण जाणून घेऊ.
राज ठाकरे म्हणाले 4 तारखेनंतर ऐकणार नाही, अन् मुस्लिम पदाधिकार्यांचे राजीनामा झाले सुरु