राजापूर: भीषण अपघातात 2 लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू, परिसरावर शोककळा

मुंबई तक

राकेश गुडेकर, रत्नागिरी: राजापूर तालुक्यात मंगळवारी (7 डिसेंबर) झालेल्या एका भीषण अपघातात 2 लहान मुलींचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाकाळे येथे हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सागरी महामार्गालगत असलेल्या बाकाळे या गावात जाणाऱ्या रस्त्याचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राकेश गुडेकर, रत्नागिरी: राजापूर तालुक्यात मंगळवारी (7 डिसेंबर) झालेल्या एका भीषण अपघातात 2 लहान मुलींचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाकाळे येथे हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सागरी महामार्गालगत असलेल्या बाकाळे या गावात जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर असलेल्या मजुरांच्या दोन लहान मुली या अपघातात मृत्युमुखी पडल्या असून दोन महिला जखमी झाल्या आहेत.

याबाबत नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुलसी कुमारी कवली शिकारी (वय 14 वर्ष) कु. आराध्या अनिल राठोड (वय 5 वर्ष) या दुपारी सव्वा एकच्या आसपास जेवण आटपून डबे घेऊन आपल्या झोपडीकडे जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या.

यावेळी जैतापुरकडून देवगडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या MH-07-X-1572 या नंबरच्या आयशर टेम्पोने भरधाव वेगाने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात जोरदार धडक दिली. यामध्ये तुलसी कुमारी कवली शिकारी हिचा जागीच मृत्यू झाला, तर आराध्या हिला जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना तिचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp