Crime : सकाळी बातमी आली, दुपारी गाडीने उडवलं; हा पत्रकाराचा खूनच! कोणी केला आरोप?

मुंबई तक

Rajapur journalist Shashikant Warishe news : रत्नागिरी : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांचा सोमवारी (६ फेब्रुवारी) भीषण अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर या रिफायनरी समर्थक व्यक्तीला अटक केली असून, त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र हा अपघात नसून घातपात आहे, जाणूनबुजून केलेला खून आहे, असा आरोप कोकण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Rajapur journalist Shashikant Warishe news :

रत्नागिरी : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांचा सोमवारी (६ फेब्रुवारी) भीषण अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर या रिफायनरी समर्थक व्यक्तीला अटक केली असून, त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र हा अपघात नसून घातपात आहे, जाणूनबुजून केलेला खून आहे, असा आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई अशी मागणीही वालम यांनी केली आहे. (Rajapur journalist Shashikant Warishe died in a horrific accident on Monday (February 6))

सोमवारी (६ फेब्रुवारी) दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर येथील पेट्रोल पंपासमोर थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आलं होतं. मात्र मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.

Aditya Thackeray यांच्या सभेत जोरदार राडा; नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp