रवी राणा vs बच्चू कडू संघर्ष शिगेला! मुख्यमंत्री शिंदेंना दिला वेगळा विचार करण्याचा इशारा
राज्यभरात गाजलेल्या आणि चर्चिल्या गेलेल्या ‘५० खोके एकदम ओके’ घोषणेवरूनच आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात राजकीय संघर्षाची ठिणगी पडलीये. राणांनी केलेल्या आरोपावरून बच्चू कडू यांनी दंड थोपटलेत. बच्चू कडूंच्या ‘प्रहार’चे कार्यकर्तेही आक्रमक झालेत. दुसरीकडे राणांच्या ‘युवा स्वाभिमान पार्टी’चे कार्यकर्तेही जशास तसं उत्तर देण्याची भाषा करू लागलेत. याच मुद्द्यावरू बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंनाही […]
ADVERTISEMENT

राज्यभरात गाजलेल्या आणि चर्चिल्या गेलेल्या ‘५० खोके एकदम ओके’ घोषणेवरूनच आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात राजकीय संघर्षाची ठिणगी पडलीये. राणांनी केलेल्या आरोपावरून बच्चू कडू यांनी दंड थोपटलेत. बच्चू कडूंच्या ‘प्रहार’चे कार्यकर्तेही आक्रमक झालेत. दुसरीकडे राणांच्या ‘युवा स्वाभिमान पार्टी’चे कार्यकर्तेही जशास तसं उत्तर देण्याची भाषा करू लागलेत. याच मुद्द्यावरू बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंनाही इशारा दिलाय.
सत्ताधारी बाकांवरील दोन आमदारांमध्ये सध्या जोरदार जुंपलीये. आमदार रवी राणा आणि प्रहारचे बच्चू कडू. दोघांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास कारण ठरलंय गुवाहाटी आणि खोके. रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केला.
बच्चू कडूंनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर सुरूवातीला बच्चू कडूंनी मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांनाही यात भूमिका मांडण्याचं आवाहन केलं होतं.
मात्र, त्यानंतर आता दोघांमधील वाक् युद्ध वाढलंय. संतापलेल्या बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणांविरुद्ध दंड थोपटले. ‘एका बापाची औलाद असेल, तर रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत’, असं आव्हान कडूंनी राणांना दिले.










