नाईट कर्फ्यूच्या नावाखाली हॉटेल्स बंद करणं हा अन्याय, संजय निरूपम यांची ठाकरे सरकारवर टीका

विद्या

नाईट कर्फ्यूच्या नावाखाली हॉटेल्स बंद ठेवणं हा हॉटेल मालकांवर केलेला अन्याय आहे अशी टीका काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केली आहे. ‘मला ठाऊक नाही की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रात्री जास्त वेगाने होतो की दिवसा? रात्री ८ ते ११ या वेळेत हॉटेल्स बंद ठेवणं म्हणजे त्यांची रोजी-रोटी हिरावून घेणं आहे. बिअर बार, पब, नाईट क्लब बंद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नाईट कर्फ्यूच्या नावाखाली हॉटेल्स बंद ठेवणं हा हॉटेल मालकांवर केलेला अन्याय आहे अशी टीका काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केली आहे. ‘मला ठाऊक नाही की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रात्री जास्त वेगाने होतो की दिवसा? रात्री ८ ते ११ या वेळेत हॉटेल्स बंद ठेवणं म्हणजे त्यांची रोजी-रोटी हिरावून घेणं आहे. बिअर बार, पब, नाईट क्लब बंद करा काही हरकत नाही. पण जी सामान्य हॉटेल्स आहेत त्यांचा व्यवसाय हा ८ ते ११ या वेळेतच होतो. ती हॉटेल्सही नाईट कर्फ्यूच्या नावाखाली बंद करणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांनी आपलं पोट कसं भरायचं?’ असाही प्रश्न संजय निरूपम यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत

आज दुपारी काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी रेस्तराँ आणि हॉटेल मालकांनी जे आंदोलन केलं त्याला साथ दिली. ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस हादेखील महाविकास आघाडीचा घटक आहे मात्र तरीही संजय निरूपम यांनी हॉटेल आणि रेस्तराँच्या मालकांना साथ देत महाविकास आघाडी सरकारवर दुसऱ्या लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावरून टीका केली. मागच्या वर्षी जो लॉकडाऊन लावण्यात आला त्यामध्ये या सामान्य हॉटेल व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं आहे. आता पुन्हा तशीच वेळ त्यांच्यावर आणू नका. कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे ही बाब कुणीही अमान्य करत नाही. मात्र हॉटेल्स बंद केली तर त्या व्यावसायिकांवर उपाशी मरायची वेळ येईल ही बाब सरकार लक्षात का घेत नाही? असाही प्रश्न संजय निरूपम यांनी विचारला आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी आज नो लॉकडाऊन प्लीज, रात्री ८ नंतर हॉटेल बंद म्हणजे आमचा व्यवसाय बंद, जीएंगे तो कोरोनासे लडेंगे असे संदेश लिहिलेले फलक घेऊन आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेस नेते संजय निरूपम आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांचाही सहभाग होता.

हे वाचलं का?