बीड : 12 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तलाठ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?
Beed Crime News : अवघ्या 12 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या एका तलाठ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : बारा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तलाठ्याची आत्महत्या
अंबाजोगाईमध्ये नेमकं काय घडलं?
रोहिदास हातागळे | बीड : बारा दिवसापूर्वी विवाहबद्ध झालेल्या आणि व्यवसायाने तलाठी असलेल्या गणेश दत्तू कोळी यांनी आज (दि.26) आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ते अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या मोरेवाडी परिसरात ज्योतीराम दळवे यांच्या घरातील रुममध्ये राहात होते. त्याच रुममध्ये त्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
हेही वाचा : Astrology : मंगळ ग्रहाचा काही राशीतील लोकांवर प्रभाव, आर्थिक आणि करिअरबाबत चांगले संकेत
लग्नाला केवळ 12 दिवस झालेले असताना केली आत्महत्या
अधिकची माहिती अशी की, गणेश कोळी हे मूळ औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील रहिवासी होते. मात्र सद्यस्थितीमध्ये ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी या पदावर कार्यरत होते. त्यांचा विवाह अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या फॉरेन्सिक डिपारमेंटमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या दिपाली हिच्या सोबत झाला होता. विशेष म्हणजे हा विवाह केवळ 12 दिवसांपूर्वी म्हणजे 13 मे 2026 रोजी बीड येथे झाला होता.
हेही वाचा : रात्री सगळे गाढ झोपले, सकाळी चिमुकलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग; कुणी केले अत्याचार?









