‘देशी जेम्स लेन’! ‘हर हर महादेव’च्या वादात ठाकरे गटाची उडी, ‘सामना’त काय म्हटलंय?
संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यावर येत असलेल्या चित्रपटांबद्दल जाहीरपणे भूमिका मांडली. इतिहासाची तोडमोड केली जात असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. या सगळ्या वादात आता शिवसेनेनंही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उडी घेतली असून, सामना अग्रलेखातून खडेबोल सुनावलेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासावर आधारित […]
ADVERTISEMENT

संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यावर येत असलेल्या चित्रपटांबद्दल जाहीरपणे भूमिका मांडली. इतिहासाची तोडमोड केली जात असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. या सगळ्या वादात आता शिवसेनेनंही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उडी घेतली असून, सामना अग्रलेखातून खडेबोल सुनावलेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासावर आधारित चित्रपट वादात सापडले असून, उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय.
सामना अग्रलेखात म्हटलंय की, “छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्मास आल्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास आहे व बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे. त्या इतिहासाची कोणत्याही पद्धतीची मोडतोड होता कामा नये. पण अशी मोडतोड झाल्याचे आक्षेप काल झळकलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबाबत जसे घेतले गेले तसे यापूर्वीच्या काही चित्रपटांबाबतही घेण्यात आले होते.”
“‘हर हर महादेव’ नामक चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल्याचा आक्षेप आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंग कसे चुकीचे आहेत याबाबत एक यादीच जाहीर केली गेली आहे”, असं सामना अग्रलेखात म्हटलेलं आहे.