Money Laundering : भावना गवळींचे सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे जवळचे सहकारी असलेले सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून भावना गवळी यांच्या वाशिम व यवतमाळमधील विविध मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

प्रताप सरनाईक, अनिल परब यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते सध्या ईडीच्या रडारवर असतानाच आता ईडीने भावना गवळी यांचे जवळचे सहकारी सईद खान यांना अटक केली आहे. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले असून, त्याचा तपास सध्या ईडीकडून केला जात आहे.

भावना गवळी यांच्या आईसह सईद खान हे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक होते. २०१९ मध्ये या संस्थेला फर्ममध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यापूर्वी ट्रस्ट होती. या ट्रस्टमध्ये स्वतः भावना गवळी आणि त्यांची आई शालिनीताई या सदस्य होत्या. ट्रस्टचे रुपांतर फर्ममध्ये करत असताना धर्मादाय आयुक्तालयात फसवणूक केली गेली असल्याचा ईडीला संशय आहे. त्याचबरोबर फर्मचा वापर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी केल्याचाही संशय आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भावना गवळी यांच्याशी संबंधित या ट्रस्टच्या व्यवहारात १७ कोटींची अनियमितता आढळून आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश सारडा यांचा आरोप आहे की, भावना गवळी यांनी बालाजी सहकारी पार्टिकल मंडळाच्या माध्यमातून ४३.३५ कोटी रुपयांचं कर्ज घेऊन राष्ट्रीय सहकारी विकास परिषदेची फसवणूक केली आहे. भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून दहा वर्षांसाठी पैसे घेतले होते. पण प्रत्यक्षात कंपनी सुरूच केली गेली नाही,’ असा सारडा यांनी केलेला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ADVERTISEMENT

बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखाना हा पार्टिकल बोर्ड चे पार्ट तयार करण्यासाठी निर्मिण्यात आला. हा कारखाना वाशिमच्या शिरोडमध्ये आहे.

ADVERTISEMENT

हा कारखाना 1992 मध्ये पुंडलिक रामजी गवळी यांनी सुरू केला. पुंडलिक गवळी हे भावना गवळी यांचे वडील आहेत. भावना गवळी या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. या फॅक्टरीला नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थातत NCDC ने भांडवल दिलं. तसंच राज्य सरकारनेही मिळून यामध्ये 55 कोटींची गुंतवणूक आहे.

इतकं सगळं होऊनही आश्चर्याची बाब ही आहे की हा कारखाना कधी सुरूच झालाच नाही. या कारखान्यात कुठलंही उत्पादन न होता हा कारखाना तोट्यात गेला असं दाखवण्यात आलं आहे.

या कारखान्यासाठी जे साहित्य मागवण्यात आलं त्याचे दर डोळे विस्फारणारे आहेत. खासरून बाहेरून आयात करण्यात आलेल्या मशीनच्या किंमती या कोड्यात टाकणाऱ्या आहेत.

या कारखान्यावर झालेला सगळ्यात आलेला आरोप हा आहे की या कंपनीचं बाजारमूल्य हे 55 कोटी असताना या कारखान्याचं अवमूल्यांकन करण्यात आलं आहे. 7 कोटी 9 लाख 90 हजार इतकं कमी मूल्य या कारखान्याचं दाखवण्यात आलं. हे अवमूल्यांकन पुण्यातील MITCON कंपनीने केलं आहे.

भावना अॅग्रो या कंपनीने बालाजी कारखाना लिक्विडेटर बोर्डाला फक्त 25 लाख रूपये दिले होते. 2010 मध्ये झालेल्या व्यवहारानंतर आज पर्यंत बालाजी कारखान्याच्या लिक्विडेटर बोर्डाकडे आजपर्यंत 6.9 कोटी रूपये येणं आहे. बालाजी कारखान्याच्या लिक्विडेटर बोर्डाने रिसोड क्रेडिट सोसायटीने मंजूर केलेल्या गॅरंटीची मागणी केली नाही. भावना अॅग्रोकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी कोणतं पाऊलही उचललेलं नाही. गैरव्यवहाराचा दुसरा भाग असा की की क्रेडिट सोसायटीने या व्यवहारासाठी मंजूर केलेली बँक गॅरंटी वसू केली नाही.. किंवा रद्दही केली नाही.

सोमय्यांचे आरोप काय?

भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून 18 कोटी रुपये काढलेले आहेत. त्यात सात कोटीं चोरीला गेल्याची तक्रार दिलीये. केंद्र सरकारचे 44 कोटी 11 कोटी रुपये स्टेट बँकेचे आहेत. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना 55 कोटींत उभारण्यात आला आणि भावना अॅग्रो लिमिटेडने फक्त 25 लाखांत तो खरेदी केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT