शाळेच्या बसमधून मुलं घरी निघाली पण वेळेत पोहचलीच नाही, जाणून घ्या सांताक्रूझमध्ये काय घडलं?

मुस्तफा शेख

मुंबईच्या सांताक्रूझ भागातील पोदार शाळेत आज सर्व पालकांची चिंता वाढवणारा एक प्रसंग घडला. या शाळेतील विद्यार्थी आज शाळा सुटल्यानंतर बसमधून घरी येण्यासाठी निघाले. परंतू दुपारी साडेबारा वाजता शाळेतून निघालेली बस नॉट रिचेबल झाल्यामुळे पालकांची काळजी वाढत गेली. मुलांच्या काळजीने अस्वस्थ झालेल्या पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली, असता त्यांना तिकडे उडवा उडवीची उत्तर मिळाल्यामुळे पालकांच्या संतापाचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईच्या सांताक्रूझ भागातील पोदार शाळेत आज सर्व पालकांची चिंता वाढवणारा एक प्रसंग घडला. या शाळेतील विद्यार्थी आज शाळा सुटल्यानंतर बसमधून घरी येण्यासाठी निघाले. परंतू दुपारी साडेबारा वाजता शाळेतून निघालेली बस नॉट रिचेबल झाल्यामुळे पालकांची काळजी वाढत गेली. मुलांच्या काळजीने अस्वस्थ झालेल्या पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली, असता त्यांना तिकडे उडवा उडवीची उत्तर मिळाल्यामुळे पालकांच्या संतापाचा कडेलोट झाला.

अखेर काही वेळाने ही मुलं घरी परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला खरा परंतू या निमीत्ताने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न समोर आला आहे.

दुपारी साडेबारा वाजता निघालेली बस साडेचार वाजेपर्यंत कुठे होती याचा जाब पालकांनी शाळेत जाऊन प्रशासनाला विचारला. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान या घटनेबद्दल माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही जणांकडून बसमधील मुलांचं अपहरण झाल्याचे मेसेज व्हायरल करण्यात आले. परंतू मुंबई पोलिसांनी यात ताबडतोक लक्ष घालत ही अफवा असून कोणत्याची प्रकारचे चुकीची माहिती सोशल मीडियावरुन न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp