Shiv Sena: पाच वर्ष ‘मुख्यमंत्री’पद दिलं तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार?
मुंबई: अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या (Chief Minister) बोलणीवरून भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली आणि महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आलं. पण आता मोदी-ठाकरे खास भेटीनंतर महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा मुख्यमंत्रीपदावरूनच जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याला निमित्त ठरलंय शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील आलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांचा एका लेखचं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज (13 जून) […]
ADVERTISEMENT

मुंबई: अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या (Chief Minister) बोलणीवरून भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली आणि महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आलं. पण आता मोदी-ठाकरे खास भेटीनंतर महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा मुख्यमंत्रीपदावरूनच जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याला निमित्त ठरलंय शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील आलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांचा एका लेखचं.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज (13 जून) संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. यामध्ये राऊत यांनी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही राजकीय पक्षांसाठी सत्ता टिकवणं किती गरजेचं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही, असं स्पष्ट केलं. पण त्याचवेळी मुख्यमंत्रीपदावरही भाष्य केलं. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी भाजपशी (BJP) युती करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत लिहितात, ‘अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे.’
युतीच्या सरकारमध्ये Shivsena गुलाम होती-संजय राऊत