राज्यात शाळा सुरु करण्याच्या दिशेने सरकारचं पहिलं पाऊल, नवीन नियमावली जाहीर

मुंबई तक

राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये किंवा ज्या गावांत कोरोनाचा प्रभाव कमी आहे अशा गावांत टप्प्याटप्प्यांमध्ये शाळा सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १५ जुलैपासून राज्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. ‘चला मुलांना, शाळेला चला’ या मोहीमेची घोषणा राज्य सरकारने केली आहे. शाळा सुरु करण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन करण्याच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये किंवा ज्या गावांत कोरोनाचा प्रभाव कमी आहे अशा गावांत टप्प्याटप्प्यांमध्ये शाळा सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १५ जुलैपासून राज्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. ‘चला मुलांना, शाळेला चला’ या मोहीमेची घोषणा राज्य सरकारने केली आहे. शाळा सुरु करण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापूर्वी पालकांची लेखी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातलं परिपत्रक जाहीर केलं आहे. १५ जुलैपासून शाळा सुरु करण्यासाठी काही निकष आखून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीत गावचे तलाठी, शाळेचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांचा समावेश असणार आहे.

आरोग्य आणि स्वच्छतेसाठी घ्यावी लागणार आहे विशेष काळजी –

  • शाळेचे वर्ग, आतील साधने आणि शाळेच्या वाहनांचं सॅनिटायजेशन

हे वाचलं का?

    follow whatsapp