एकनाथ शिंदेंची सुरक्षा : सुहास कांदे, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई तक

बंडखोर आमदार सुहास कांदे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी आली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता, असा दावा सुहास कांदे आणि शंभूराज देसाईंनी केला आहे. दरम्यान, शंभूराज देसाईंच्या आरोपांवर माजी गृह राज्यमंत्री […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बंडखोर आमदार सुहास कांदे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी आली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता, असा दावा सुहास कांदे आणि शंभूराज देसाईंनी केला आहे. दरम्यान, शंभूराज देसाईंच्या आरोपांवर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शंका उपस्थित केलीये.

“एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. किंबहुना त्यांना मारण्यासाठी ठाण्यात आणि मुंबईत आले. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो, एसआयडी, सीआयडी यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना याबद्दलचा रिपोर्ट दिला. त्यानंतरही त्यांची सुरक्षा वाढवली नाही. त्यांना झेड प्लस सुरक्षेची गरज होती. हिंदुत्व विरोधकांना सुरक्षा दिली गेली, पण हिंदुत्ववाद्यांना सुरक्षा दिली नाही. ती का दिली गेली नाही?,” असं सुहास कांदे म्हणाले.

एकना शिंदे यांच्या सुरक्षेवरून सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंवर काय केला आरोप?

“सकाळी साडेआठ वाजता शंभूराजेंना वर्षा बंगल्यावरून फोन आला की, एकनाथ शिंदेंना सुरक्षा द्यायची नाही. मग एकनाथ शिंदे यांना सुरक्षा का दिली गेली नाही हा प्रश्न माझा आदित्य ठाकरेंना आहे,” असा सवाल सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना केला.

‘एकनाथ शिंदे सुरक्षा दिली नाही’ : सुहास कांदेंच्या आरोपावर शंभूराज देसाई काय म्हणाले?

“तत्कालिन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माओवाद्यांचं एक पत्र आलं होतं. त्यांच्या जिवाला धोका असल्याचं, त्यांच्या कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याचा स्पष्ट उल्लेख माओवाद्यांच्या पत्रात होता. हे पत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर ते गृह विभागातील अधिकाऱ्यांकडे गेलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp