Vidhan Sabha: ‘आदित्य ठाकरेंची DNA टेस्ट करा, बाळासाहेबांचे नातू आहेत का ते तपासा’, Nitesh Rane यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘मी बाळासाहेबांचा नातू आहे हे मी पण सांगू शकत नाही अशी अवस्था आहे. म्हणून अध्यक्ष महोदय खरंच त्यांचा डीएन तपासण्याची वेळ आलेली आहे. की, हे खरंच आहे की, कुठे कचऱ्यातून उचलेले आहेत. हे तपासण्याची वेळ आलेली आहे.’ असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली आहे.

विधानसभेत काल (5 जुलै) भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे आज (6 जुलै) भाजपच्या वतीने थेट विधानसभेच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा घेण्यात आली.

विधानसभेत विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही असं म्हणत भाजपने सभागृहाबाहेर प्रति विधानसभेचं आयोजन केलं होतं. ज्यावर सत्ताधारी आमदारांनी विरोध केल्यानंतर मार्शलच्या माध्यमातून भाजपच्या आमदारांना हटविण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यानंतर भाजप आमदार पत्रकार कक्षात अभिरुप विधानसभा स्थापन करुन सरकारवर टीका सुरु केली. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे हे फारच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

पाहा नितेश राणे नेमकं काय म्हणाले:

ADVERTISEMENT

‘महानगरपालिकेत आज कुठल्या बाबतीत भष्ट्राचार नाही ते सांगा? भ्रष्टाचार करणारे सगळे कलानगरमध्ये जमा झाले असतील तर उर्वरित मुंबईत काही राहतच नाही. गेल्या अधिवेशनामध्ये उल्लेख केलेला ज्या पद्धतीने मुंबईत विविध भागात भ्रष्टाचार होतो.’

ADVERTISEMENT

‘कलानगरमध्ये बसलेले त्यांचे व्यक्ती, नातेवाईक. मग ते बीकेसीमध्ये असलेले वैभव चेंबर्स असो, किंवा कर्जतचा कोणाचा फार्म हाऊस असो. अशा असंख्य वेगवेगळ्या जागा आहेत. जिथे मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकारचा आज राजरोस पद्धतीने भ्रष्टाचार सुरु आहे.’ असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

‘ऑक्सिजन प्लांटसाठी जवळपास 84 कोटींचं टेंडर निघालं आहे. आता ते टेंडर नेमकं दिलं कोणाला तर ते जे पेंग्विन भायखळ्यामध्ये ज्या कंपनीने आणलेले आहेत त्याच कंपनीला टेंडर दिलेलं आहे.’ असाही आरोप नितेश राणेंकडून शिवसेनेवर करण्यात आला आहे.

‘ते आता पेंग्विनसारखा आवाज असल्यामुळे आता करणार काय? मी बाळासाहेबांचा नातू आहे हे मी पण सांगू शकत नाही अशी अवस्था आहे. (आदित्य ठाकरे यांची नक्कल करुन) म्हणून अध्यक्ष महोदय खरंच डीएन तपासण्याची वेळ आलेली आहे की, हे खरंच आहे की, कुठे कचऱ्यातून उचलेले आहेत. हे खरंच तपासण्याची वेळ आलेली आहे.’ असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केली आहे.

Vidhan Sabha: ‘आदित्य ठाकरेंची DNA टेस्ट करा, बाळासाहेबांचे नातू आहेत का ते तपासा’, Nitesh Rane यांचे वादग्रस्त वक्तव्य

‘ज्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरु आहे ते निंदनीय आहे, आपल्या नातेवाईकांनाच सगळं काही द्यायचं. पण जेव्हा प्रताप सरनाईकांसारखे अडचणीत येतात तेव्हा त्यांना कलानगरमध्ये बोलावून सांगितलं जातं की, तुमची लढाई तुम्हीच लढा. मग सरनाईकांसारख्यांना सांगावं लागतं की, माझ्या पाठिशी कुणीही उभं नाही.’ अशा पद्धतीने नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT