रझाकारांनी कडब्याच्या गंजीवर टाकून 7 जणांना जिवंत जाळले; सर्व गाव धायमोकलून रडत होतं
निजामाच्या राज्यात रझाकारांचा अत्याचार वाढतच होता. तसतसं उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्रामासाठी झपाटलेले सैनिक चळवळीत सक्रिय होत होते. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा या सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला लागून असल्याने येथील चळवळ जोर धरू लागली. त्याचं कारण म्हणजे सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे स्वातंत्र्य भारताच्या हद्दीत येत होते. त्यामुळे चळवळ राबवत असताना निजामाच्या पोलिसांना चकवा देण्यासाठी या सीमा […]
ADVERTISEMENT

निजामाच्या राज्यात रझाकारांचा अत्याचार वाढतच होता. तसतसं उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्रामासाठी झपाटलेले सैनिक चळवळीत सक्रिय होत होते. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा या सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला लागून असल्याने येथील चळवळ जोर धरू लागली. त्याचं कारण म्हणजे सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे स्वातंत्र्य भारताच्या हद्दीत येत होते. त्यामुळे चळवळ राबवत असताना निजामाच्या पोलिसांना चकवा देण्यासाठी या सीमा भागातील कॅम्पमध्ये भूमिगत होत होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील गौर गावात देखील तरुण स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले होते. गावचे पाटील विठ्लराव पाटील निजामाकडे नोकरी करत असले तरी त्यांची देखील भावना निजामापासून सुटका हीच होती. त्यामुळे गावात निजामांविरोधात होणाऱ्या कारवायांकडे ते दुर्लक्ष करत असे. मात्र गावचा कोतवाल हसन हा रझाकारांचा चेला होता. गौर गावाजवळच येरमाळा हे गाव आहे. त्याठिकाणी रझाकार राहत असे. तसंच येरमाळा गावात निजामाचं पोलीस स्टेशन देखील होतं. याच ठिकाणी कमाल खान नावाचा क्रूर रझाकार राहत होता.
सालार ए खबिरचा आदेश
गौर गावात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. येथील तरुण देशासाठी मरायला देखील तयार होते. कॅम्पसाठी या गावातील लोक धान्य आणि पैसे जमा करायचे. कमाल खानला हसन कोतवालकडून याची कुणकुण लागली होती. त्यामुळे कमाल वरील आदेशाची वाट पाहत होता. अशात गौरीच्या काही तरुणांनी 2 रझाकारांच्या काटा काढला. ही बातमी सालार ए खबिर म्हणजेच रझाकारांच्या जिल्हा प्रमुखपर्यंत पोहचली. सालार ए खबीर ने सालार ए सगिर म्हणजे तालुकाप्रमुखाला गौर गावच्या लोकांना चांगली अद्दल घडवा, असे आदेश दिले.
शेकडो पोलीस आणि रझाकार गौर गावात घुसले
दोन रझाकारांना मारल्याच्या रागात येरमाळा येथील पोलीस, शेकडो रझाकार हत्यारं घेऊन गौर गावात आले. तेथील पोलीस पाटील विठ्ठलराव पाटील आणि अंबादास कुलकर्णी यांना रझाकारांना कोणी मारल्याची विचारणा केली. आम्हाला काही माहित नसल्याचं दोघांनी सांगितलं. खोटं बोलतात का म्हणून दोघांना बेदम मारहाण केली. कोतवाल हसनने काहींचे घरे दाखवली. असेल tya अवस्थेत रझाकारांनी त्यांना बांधून आणलं आणि विचारणा केली. मात्र कोणी काहीच सांगत नव्हतं.