भारतातलं Vaccination दोन-तीन महिन्यांमध्ये होणं शक्य नाही- अदर पूनावाला

मुंबई तक

भारतात लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेगही चांगलाच मंदावला आहे. अशात सिरम इन्स्टिट्युटचे CEO अदर पूनावाला यांनी एक पत्रक काढलं आहे. या पत्रकामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातल्या नागरिकांचं लसीकरण दोन-तीन महिन्यांमध्ये होणं शक्य नाही असं या पत्रकाद्वारे पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही भारताल्या ज्या किंमतीत कोव्हिशिल्ड या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतात लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेगही चांगलाच मंदावला आहे. अशात सिरम इन्स्टिट्युटचे CEO अदर पूनावाला यांनी एक पत्रक काढलं आहे. या पत्रकामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातल्या नागरिकांचं लसीकरण दोन-तीन महिन्यांमध्ये होणं शक्य नाही असं या पत्रकाद्वारे पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही भारताल्या ज्या किंमतीत कोव्हिशिल्ड या लसींचा पुरवठा केला त्या दराने निर्यात केलेली नाही.

18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?

आणखी काय म्हटलं आहे पत्रामध्ये?

भारतात जानेवारी 2021 या महिन्यापासून लसीकरण सुरू झालं. फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण सर्वात आधी करण्यात आलं. त्यावेळी जगातल्या इतर देशांमध्येही कोरोना वाढत होता. त्यामुळे त्यांच्याही देशातील जनतेचा विचार करून आम्ही लसी निर्यात केल्या. त्यामुळेच आज घडीला आपल्या संकट काळात इतर देश आपल्या देशाला मदत करत आहे. कोरोना व्हायरस हा काही देशांच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही. त्यामुळे सगळ्या जगाचं लसीकरण होणं आवश्यक आहे. आपल्या देशाची लोकसंख्या अफाट आहे त्यामुळे आपल्या देशात 2-3 महिन्यात संपूर्ण लसीकरण होणं शक्य नाही. देशातील लसींची मागणी पाहता आम्ही पुरवठा वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहोत असंही या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp