शेतकऱ्यांना पाठिंबा पण बंदमध्ये आम्हाला खेचू नका ! Maharashtra Bandh ला व्यापाऱ्यांचा विरोध
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडविरुद्ध महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतले तिन्ही घटकपक्ष एकत्र आले असून ११ ऑक्टोबरला राज्यात बंदची घोषणा करण्यात आली आहे. परंतू या बंदला आता व्यापारी वर्गातून विरोध व्हायला लागला आहे. पुण्यासोबतच मुंबईतील काही व्यापारी आणि दुकानदारांनी या बंदला विरोध केला आहे. शेतकऱ्यांना […]
ADVERTISEMENT

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडविरुद्ध महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतले तिन्ही घटकपक्ष एकत्र आले असून ११ ऑक्टोबरला राज्यात बंदची घोषणा करण्यात आली आहे. परंतू या बंदला आता व्यापारी वर्गातून विरोध व्हायला लागला आहे.
पुण्यासोबतच मुंबईतील काही व्यापारी आणि दुकानदारांनी या बंदला विरोध केला आहे. शेतकऱ्यांना आमचा पाठींबा आहे, पण बंदमध्ये दुकानदारांचा खेचू नका असं आवाहन मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेन शहा यांनी केलं आहे.
बंदमध्ये आम्हाला खेचू नका !
शेतकऱ्यांना आमचा पाठींबा आहे, परंतू उद्या सर्व दुकानं सुरुच राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांचा खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच कालावधीने दुकानं सुरु झाली आहेत. सध्या नोकरांना वेळच्या वेळी पगार देणं जिकरीचं होऊन बसलं आहे. शेतकऱ्यांना आमचा नेहमीच पाठींबा असेल अशी भूमिका विरेन शहा यांनी मांडली.