पंतप्रधानांच्या बैठकीत उद्धव ठाकरे अनुपस्थित, मुख्यमंत्र्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याची चर्चा का होते आहे?

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी देशातील कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे त्याचा आढावा घेतला. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सहभागी होण्यास सांगितलं होतं. मात्र ते या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी देशातील कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे त्याचा आढावा घेतला. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सहभागी होण्यास सांगितलं होतं. मात्र ते या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली ही बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित नसल्याने त्यांच्या प्रकृतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही बैठकीला हजर राहू शकत नाहीत का? एवढी त्यांची प्रकृती चांगली नाही का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्याची काळजी आहे की नाही असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

काय आहे चंद्रकांत पाटील यांचं ट्विट?

हे वाचलं का?

    follow whatsapp