उद्धव ठाकरेही ‘राज्यपाल हटाव’साठी मैदानात : भाजपमधील लोकांनाही सोबतही घेण्याची तयारी
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे ही मैदानात उतरले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना हटविण्यासाठी येत्या-दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र बंदची हाक देणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं आहे. यासाठी प्रसंगी भाजपमधील महाराष्ट्रप्रेमींनाही सोबत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत […]
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे ही मैदानात उतरले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना हटविण्यासाठी येत्या-दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र बंदची हाक देणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं आहे. यासाठी प्रसंगी भाजपमधील महाराष्ट्रप्रेमींनाही सोबत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यपाल हटाव मोहिम : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रात ज्या विचारांचं सरकार आहे, त्यांच्याच विचारांचे राज्यपाल पाठविले जात असतात. त्या माणसाची कुवत, पात्रता काय असते? ज्येष्ठांनी गैरसमज करुन घेऊ नये, पण ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते अशांना राज्यात राज्यपाल म्हणून पाठविलं जातं का? हा ही प्रश्न विचारायला पाहिजे.
राज्यपाल नियुक्तीचे निकष आता ठरवायला हवेत. राज्यपालही राष्ट्रपतींप्रमाणे निष्पक्ष असावेत. राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घेतलं जातं. पण कोणत्याही व्यक्तीवर राज्यपाल पदाची झूल पांघरली म्हणून त्यांनी वेडेवाकडे बोलावे हे मान्य करणार नाही.
आधी मराठी माणूस आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी वक्तव्यं केली. पण बाप हा बाप असतो, तो नवा-जुना कसा म्हणायचा? केंद्रात ज्या विचारांचं सरकार, त्याच विचारांच्या राज्यपालांना पाठविलं जातं. त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारींच्या सडक्या डोक्यामागे कोण आहे हे शोधण्याची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.