उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा नेमका अर्थ समजून घ्या 10 मुद्द्यांमध्ये

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (22 जून) संध्याकाळी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांनी मला समोर येऊन सांगितलं तर मी स्वतः मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. फक्त मुख्यमंत्री पदच नाही तर शिवसेनेचं पक्षप्रमुख सोडण्यास तयार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. जाणून घेऊयात उद्धव ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (22 जून) संध्याकाळी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांनी मला समोर येऊन सांगितलं तर मी स्वतः मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. फक्त मुख्यमंत्री पदच नाही तर शिवसेनेचं पक्षप्रमुख सोडण्यास तयार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. जाणून घेऊयात उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हमधील 10 महत्त्वाचे मुद्दे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे:

1. आम्ही बराच काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होतो. पण महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना ज्या घडामोडी झाल्या त्यावेळी शरद पवारांनी मला बाजूला नेलं आणि म्हणाले की, जबाबदारी तुमच्या खांद्यावर द्यावी लागेल.

2. शरद पवारांनी त्यावेळी मला मुख्यमंत्री व्हायला सांगितले. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सांगितलं तर मी तत्काळ राजीनामा देण्यास तयार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp