ईडीच्या चार्जशीटमध्ये शरद पवारांचा उल्लेख करण्यामागचं कारण आहे तरी काय?

मुंबई तक

संजय राऊत अटक असलेल्या पत्राचाळ प्रकरणाचं चार्जशीट ईडीने सोमवारी दाखल केलं. या चार्जशीटमध्ये काही मोठ्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे याची चर्चा जोरात सुरु आहे. या चार्जशीटमध्ये प्रामुख्याने 2006 सालचे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री यांचा उल्लेख आहे. त्यावेळी युपीएचं सरकार होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यामुळे आता याप्रकरणी शरद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

संजय राऊत अटक असलेल्या पत्राचाळ प्रकरणाचं चार्जशीट ईडीने सोमवारी दाखल केलं. या चार्जशीटमध्ये काही मोठ्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे याची चर्चा जोरात सुरु आहे. या चार्जशीटमध्ये प्रामुख्याने 2006 सालचे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री यांचा उल्लेख आहे. त्यावेळी युपीएचं सरकार होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यामुळे आता याप्रकरणी शरद पवार यांची चौकशी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.

चार्जशीटमध्ये शरद पवारांचा उल्लेख करण्यामागचं कारण काय?

ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवलं आहे. तसंच 2006/2007 मध्ये संबंधित प्रकल्पासंदर्भात बैठकांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. 12.08.2006 रोजी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री यांच्या म्हणजेच शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. चार्जशीटमध्ये पवारांच्या नावाचा उल्लेख न करता केंद्रीय कृषिमंत्री असा करण्यात आला आहे. या बैठकीला संबंधित विभागाचे काही अधिकारी, ठक्कर डेव्होल्पर आणि महत्वाचं म्हणजे स्वतः संजय राऊत हे देखील उपस्थित होते, असं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

या बैठकीत पुनर्विकाससंदर्भात चर्चा झाली. विविध विषयांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली. यादरम्यान अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाली. ज्यामध्ये केंद्रीय कृषीमंत्र्यांनी जाहीर केले की जीआरमध्ये कोणताही फेरबदल करणे, हा सचिवांनी नव्हे तर सरकारने निर्णय घ्यायचा आहे. तसंच त्यांनी न्यायालयाच्या निकालांच्या प्रती सचिवांना सादर करण्यास सांगितले, असं ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp