उद्धव ठाकरेंची साथ सोडावी हे वाटणारा ट्रिगर पॉईंट कुठला होता? मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव आहे. कारण शिवसेनेत बंड पुकारत थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदारांनी वेगळा गट तयार केला. त्यानंतर शिवसेना दुभंगली. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी गणपतीच्या निमित्ताने उपस्थिती दर्शवली. एबीपी माझाला दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव आहे. कारण शिवसेनेत बंड पुकारत थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदारांनी वेगळा गट तयार केला. त्यानंतर शिवसेना दुभंगली. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी गणपतीच्या निमित्ताने उपस्थिती दर्शवली. एबीपी माझाला दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत उद्धव ठाकरेंना सोडण्याचा निर्णय कसा घेतला ते त्यांनी सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?
२०१९ ला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यानंतर जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तोच आम्हाला मान्य नव्हता. त्यावेळी पक्षाचा आदेश म्हणून ते मान्य केलं. आम्ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे कार्यकर्ते. नेतृत्वाचा निर्णय झाला म्हणून आम्ही काम करू लागलो. पण खूप आमदारांची महाविकास आघाडीला मान्यता नव्हती.
एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार?; दीपक केसरकरांनी केला खुलासा
शिवसैनिकांना त्रास दिला जात होता
शिवसैनिकांना त्रास होतो आहे, त्यांचं खच्चीकरण केलं जातं आहे. आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आमच्याच घटकपक्षातले लोक कार्यक्रम करत होते. भूमिपूजन करत होते. तसंच बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका यांची गळचेपी होत होती. सरकारची ध्येयधोरणं वगैरे सगळंच लादलं जातं आहे हे जाणवत होतं.