बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदेंचे?

मुंबई तक

बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे? हा प्रश्न महाराष्ट्रात सध्या निर्माण झाला आहे. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यात त्यांनी हेच म्हटलं आहे की आम्ही बाळासाहेबांचा वारसा आणि विचार पुढे जात आहोत असं म्हटलं होतं. ते सातत्याने तेच म्हणत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना भरकटली म्हणून आम्ही शिवसेनेत तो विचार पुढे घेऊन जातो आहोत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे? हा प्रश्न महाराष्ट्रात सध्या निर्माण झाला आहे. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यात त्यांनी हेच म्हटलं आहे की आम्ही बाळासाहेबांचा वारसा आणि विचार पुढे जात आहोत असं म्हटलं होतं. ते सातत्याने तेच म्हणत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना भरकटली म्हणून आम्ही शिवसेनेत तो विचार पुढे घेऊन जातो आहोत असं एकनाथ शिंदे यांनी सातत्याने म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं बाळासाहेब ठाकरेंविषयी काय म्हटलं आहे?

जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईसाठी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही आता आपली जबाबदारी आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न धुळीस मिळवलं. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. ते इतके आत्ममग्न आणि इतके आत्मकेंद्रीत होते की ते स्वतःच्या पलिकडे काहीही पाहू शकले नाहीत. मुंबई आणि मुंबईकरांकडे त्यांनी पाहिलं नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचं आहे. मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिलं आहे, जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं आहे ते पूर्ण करण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे. असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ फॉर्म्युल्यावरच उद्धव ठाकरे पुन्हा करत आहेत शिवसेनेची उभारणी

हे वाचलं का?

    follow whatsapp