Raj Thackeray : राज ठाकरेंनी औरंगाबादेतील सभेसाठी हेच मैदान का निवडलं?

मुंबई तक

राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये सभा घेत आहेत. त्यांनी पुण्यात या सभेबद्दलची घोषणा केली होती. मुंबई, ठाण्यानंतर राज यांनी थेट औरंगाबादची निवड केल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. औरंगाबाद किंवा ते म्हणतात त्याप्रमाणे संभाजी नगरच का निवडलं? त्याचं एक कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे! बाळासाहेबांनी १९८८ मध्ये औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर मराठवाड्यातील पहिली सभा घेतली होती. आता याच मैदानावर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये सभा घेत आहेत. त्यांनी पुण्यात या सभेबद्दलची घोषणा केली होती. मुंबई, ठाण्यानंतर राज यांनी थेट औरंगाबादची निवड केल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. औरंगाबाद किंवा ते म्हणतात त्याप्रमाणे संभाजी नगरच का निवडलं? त्याचं एक कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे! बाळासाहेबांनी १९८८ मध्ये औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर मराठवाड्यातील पहिली सभा घेतली होती. आता याच मैदानावर राज ठाकरे सभा घेत आहेत. इथेच सभा घेण्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी केलेलं विश्लेषण…

“राज ठाकरे यांनी औरंगाबाद निवडण्याचं कारण हिंदुत्वाचा व्यापक मुद्दा त्यांना आता देशभर घेऊन जायचा असावा आहे तोच हेतू आहे. औरंगाबाद आणि शिवसेनेचं नातं हे १९८७ पासून खूप घट्ट झालं आहे. १९८७ ला त्यांनी पहिली शाखा सुरू केली. त्यापाठोपाठ दोन दंगलीही घडवून आणल्या. १९८८ ला महापालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा परिस्थिती अशी होती की ८० जागांसाठी शिवसेनेकडे उमेदवारही नव्हते. ६० जागा त्यावेळी शिवसेनेने लढवल्या होत्या. त्याचा मुद्दा हिंदुत्व होतंच पण मुस्लिम विरोध हा प्रमुख मुद्दा होता.”

Raj Thackeray Pune: ..तर आम्ही शांत बसणार नाही, दगड आम्हालाही हातात धरता येतो: राज ठाकरे

हे वाचलं का?

    follow whatsapp