वीर सावरकर, आकाशवाणीचा वाद याबाबत भाष्य करण्यास हृदयनाथ मंगेशकर यांचा नकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वीर सावरकर, आकाशवाणी या सगळ्या विषयांवर बोलण्यास पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी नकार दिला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावरकर यांचं ने मजसी ने परत मातृभूमीला हे गाणं संगीतबद्ध केल्याने त्यांना आकाशवाणीतून काढून टाकण्यात आलं होतं. हा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला होता आणि त्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत हा उल्लेख केला होता. तसंच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हृदयनाथ मंगेशकर यांनी हे सांगितल्याचं उदाहरणही दिलं होतं. मात्र आज या सगळ्या विषयावर भाष्य करण्यास हृदयनाथ मंगेशकर यांनी नकार दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आज हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पंडित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर केले. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.

हृदयनाथ मंगेशकरांना खरंच आकाशवाणीतून काढून टाकलं का? जाणून घ्या काय म्हणाले होते हृदयनाथ मंगेशकर?

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी असा दावा केला होता की ‘ने मजसी ने परत मातृभूमिला’ ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता मी आकाशवाणीवर ध्वनीमुद्रीत केली आणि त्यामुळे मला आकाशवाणीने आधी कारणे दाखवा नोटीस दाखवली. त्यानंतर ८ दिवसांतच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच गोष्टीचा आधार घेत राज्यसभेत भाषण करताना काँग्रेसला सणसणीत चिमटे काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत काय म्हणाले होते?

लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झाला आहे. पण लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील होतं. पण त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला.. हे देखील देशाला समजलं पाहिजे. लता दीदींचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकरजी.. गोव्याचा सुपुत्र. त्यांना ऑल इंडियो रेडिओमधून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं..’

‘त्यांचा गुन्हा काय होता? त्यांचा गुन्हा हा होता की, त्यांनी वीर सावरकर यांची एक कविता ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित केली होती. हृदयनाथजी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांची मुलाखत उपलब्ध आहे. त्यांनी मुलाखतीत सांगितलं की, मी जेव्हा सावरकरांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की, तुमच्या कवितेवर एक गाणं बनवायचं आहे तेव्हा सावरकरजी म्हणाले. माझी कविता गाऊन तुम्हाला काय तुरुंगात जायचं आहे का?’

‘तरीही हृदयनाथ यांनी त्यांची कविता संगीतबद्ध केली त्यानंतर आठ दिवसाच्या आत त्यांना ऑल इंडियामधून काढून टाकण्यात आलं. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का?’ असा आरोप मोदींनी राज्यसभेत बोलताना केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT