वा रे मावळ्यांनो! शिवजन्मभूमीतल्या किल्ले जीवधनला लोकवर्गणीतून नवे प्रवेशद्वार

मुंबई तक

– स्मिता शिंदे, जुन्नर प्रतिनिधी शिवजन्मभुमी अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनचं उध्वस्त झालेलं शिवकालीन प्रवेशद्वार सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी लोकवर्णीच्या माध्यमातून पुन्हा उभारलं आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराचा दुर्गार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गेल्या तीन वर्षांमध्ये या प्रतिष्ठानने १४ किल्ल्यांची उध्वस्त झालेली प्रवेशद्वारं लोकवर्गणीच्या माध्यमातून पुन्हा उभी केली आहेत, ज्यासाठी त्यांचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– स्मिता शिंदे, जुन्नर प्रतिनिधी

शिवजन्मभुमी अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनचं उध्वस्त झालेलं शिवकालीन प्रवेशद्वार सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी लोकवर्णीच्या माध्यमातून पुन्हा उभारलं आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराचा दुर्गार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

गेल्या तीन वर्षांमध्ये या प्रतिष्ठानने १४ किल्ल्यांची उध्वस्त झालेली प्रवेशद्वारं लोकवर्गणीच्या माध्यमातून पुन्हा उभी केली आहेत, ज्यासाठी त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

जीवधन किल्ल्याचा कल्याण दरवाजा व त्या पुढील पायरी मार्ग इंग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केला होता. तेव्हापासून हा पायरीमार्ग दगड मातीने व्यापलेला होता. पायरी मार्गातला अडथळा दूर केल्याशिवाय प्रवेशद्वार बसवणे शक्य नव्हते म्हणूनच प्रतिष्ठानने प्रथम हे अडथळे दूर करण्याचा संकल्प केला. यानुसार नोव्हेंबर २०२० मध्ये प्रतिष्ठानने या कामाचा श्रीगणेशा केला. प्रतिष्ठानच्या १५० ते २०० दुर्गसेवकांनी वर्षभर दर शनिवार व रविवार श्रमदान करून प्रवेशद्वाराच्या मार्गातील अडथळे दूर केले. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या दुर्गार्पण सोहळ्यात यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान व शिवजन्मभूमी विभागाचे शेकडो दुर्गसेवक उपस्थित होते. प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण होताच दुर्गसेवकांनी एकच जल्लोष केला. वर्षभर मेहनत घेऊन प्रवेशद्वार उभारल्याचे समाधान यावेळी दुर्गसेवकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp