आम्हाला गोळ्या घालून प्रकल्प राबवणार आहात का? नाणारवासीय आक्रमक - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / आम्हाला गोळ्या घालून प्रकल्प राबवणार आहात का? नाणारवासीय आक्रमक
बातम्या

आम्हाला गोळ्या घालून प्रकल्प राबवणार आहात का? नाणारवासीय आक्रमक

रत्नागिरी – राजापूर येथील रिफायनरी प्रोजेक्टला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पाठींबा दर्शवला. सुरुवातीला नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंचं नंतर परिवर्तन कसं झालं असा सवाल आता विचारला जात आहे. शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंना कोकणातील रोजगाराची चिंता आहे की नाणारमध्ये जमिनी घेतलेल्या गुजराती भूमाफियांची असा प्रश्न विचारला होता. अशातच नाणार प्रकल्पविरोधी समितीचे प्रमुख अशोक वालम यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करत…आम्हाला गोळ्या घालून नाणार प्रकल्प राबवणार आहात का असा सवाल विचारला आहे.

राज ठाकरे म्हणतात, नाणार प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नाही!

“नाणारमध्ये येऊन राज ठाकरेंनी १० हजार लोकांपुढे हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही असं सांगितलं होतं. मुंबईतल्या BKC येथील हिरे व्यापाऱ्यांनी नाणारमध्ये जवळपास ९०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यांचा पैसा इथे अडकल्यामुळे ते राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत. आजही स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध आहे. कोकणात जर रोजगार आणायचा असेल आणि राजकीय नेत्यांना जर आमची चिंता असेल तर कोकणात उत्पादन होणाऱ्या आंबा, काजू, फणस, रातआंबे, बांबू यासारख्या उत्पादनांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आणावेत. पर्यटनाच्या माध्यमातूनही कोकणात विकास करता येऊ शकतो. त्याचं आम्ही स्वागतच करु. परंतू गुजराती-मारवाडी व्यापाऱ्यांचे अडकलेले पैसे सोडवण्यासाठी तुम्ही रिफायनरीला पाठींबा देणार असाल तर तिकडे असलेल्या हजारो लोकांचे तुम्ही बळी घेणार आहात का? आमच्यावर गोळ्या घालून तो प्रकल्प राबवणार आहात का? याचंही उत्तर राजकीय नेत्यांनी द्यावं”, अशी मागणी अशोक वालम यांनी केली आहे.

दरम्यान मनसे यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांना पत्र लिहत रत्नागिरी – राजापूर प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नसल्याचं म्हटलं होतं. कोकणातील तरुण नोकरी-धंद्यासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागत आहे. पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं, परंतू यादृष्टीने विचार झालाच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. रत्नागिरी-राजापूर रिफायनरी प्रकल्पांमुळे उद्योग निर्माण होतील आणि स्थानिक तरुणांना इथे जास्तीत जास्त संधी मिळेल. प्रकल्पाशी संबंधित पर्यावरणीय चिंता मी देखील समजू शकतो. परंतू जैतापूर प्रकल्पाच्या वेळी मी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी बोलून माझ्या मनातल्या शंका दूर केल्या. याच पद्धतीने तज्ज्ञांशी संवाद साधून कोकणाचं पर्यावरणाच्या दृष्टीने नुकसान होणार नाही हे पहायला हवं असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

गुजराती भूमाफियांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करतायत का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × two =

भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त ‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट! CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी! नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का? IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं! Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण… IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल! Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात ‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या Paresh Rawal : बॉसच्या मुलीवरच जडला जीव, 12 वर्ष डेटिंग नंतर…; अभिनेत्याची भन्नाट लव्हस्टोरी ‘वीर सावरकरां’च्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं 26 किलो वजन, केलं कडक डाएट! आमिर खानच्या मुलीचा रिक्षातून प्रवास, साधेपणा दाखवूनही ट्रोल बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला! Karishma Kappor चा फिटनेस फ्रिक डाएट, 48 व्या वर्षीही कमालीची फिगर कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा ‘ओरी’ कोण? महिलेने सांगितले श्रीमंत पतीचे तोटे; यूजर्स म्हणाले, ‘जास्त पैसे असतील तर..’