Kangana Ranaut: ‘1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं’, कंगनाचं वादग्रस्त विधान
नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आता देखील कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं आहे की, ‘1947 साली […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आता देखील कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं आहे की, ‘1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’
अभिनेत्री कंगना राणौत हिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर ज्या पद्धतीने भूमिका घेतली होती. तेव्हापासून ती प्रचंड चर्चेत आहे. त्याचवेळी तिने काही वादग्रस्त वक्तव्य देखील केली होती. आता देखील कंगनाने अतिशय बेजबाबदारपणे एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना कंगना राणावत म्हणाली की, ‘1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’
पाहा कंगनाचं नेमकं विधान काय