कोरोना काळात खासगी हॉस्पिटल मनमानी करीत असेल तर काय करावे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोना (Corona) काळात अनेकांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले आणि त्यातही अनेकांना खासगी रुग्णालयांच्या (Private Hospital) मनमानीला बळी पडावं लागलं. त्यामुळे बऱ्याच जणांना आपल्या क्षमतेपेक्षा रुग्णालयाचे अधिक बिल (Hospital Bill) भरावे लागले. आता अशीच काही उदाहरणं आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत ज्यामुळे खासगी रुग्णालयाची मनमानी कशी सुरु होती हे आपल्याला समजू शकतं.

1. 16 एप्रिल रोजी कोरोना संक्रमित शिक्षक अंकलेश पवार यांना महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंकलेश यांना रुग्णालयात दाखल करताना त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात 50 हजार रुपये जमा केले होते. दरम्यान, 20 एप्रिल रोजी अंकलेशची तब्येत अधिक बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये हलविण्यात आले.

21 एप्रिल रोजी रुग्णालयाने अंकलेशच्या पत्नीकडे अधिकचे पैसे मागितले. दरम्यान, 24 एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकांनी 50 हजार रुपये ऑनलाईन आणि 40 हजार रुपये रोख रूग्णालयात भरले. पण त्याच दिवशी दुपारी रुग्णालयाने अंकलेशच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली. त्यामुळे त्याचे कुटुंबीयांनी स्मशानात जाऊन अंकलेशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कुटुंब मृतदेहासह निघून गेले आणि अंत्यसंस्कारात सामील झाले. दरम्यान, याप्रकरणी आता कोर्टाने पोलिसांना सर्व बाबींची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गोदावरी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांविरूद्ध कलम 420 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता घरच्या घरीच करता येणार कोरोना चाचणी, ICMR ची होम बेस्ड कोव्हिड टेस्टिंग किटला मंजुरी

2. आता आपण नोएडाच्या परमजीतविषयी जाणून घेऊयात. परमजीत याची कोरोनामुळे प्रकृती खालावली आणि दिल्ली एनसीआरमध्ये त्याला कुठेही बेड उपलब्ध होऊ शकला नाही म्हणून तो थेट पंजाबमधील मोहाली येथे गेले. येथे 26 एप्रिल रोजी न्यू लाइफलाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 14 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्याच्या उपचारांचं बिल होतं तब्बल 9 लाख रुपये.

ADVERTISEMENT

आम्ही आपल्याला उदाहरणादाखल या दोनच घटनांविषयी सांगितलं. मात्र, महाराष्ट्रात आणि देशात अनेक खासगी रुग्णालयात अशा घटना घडत असल्याचं सातत्याने समोर येत आहे.

ADVERTISEMENT

गेल्या दीड वर्षापासून एकही कोरोना रुग्ण न सापडलेलं महाराष्ट्रातील गाव!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा का नाही?

वरील काही घटनांवरुन आपल्याला लक्षात येईल की, काही खासगी रुग्णालयं ही अतिशय बेजबाबदारपणे वागत असून आपलीच मनमानी करत आहेत. दरम्यान याच मनमानीविरोधात कोर्टाने आता काही आदेशही दिले आहेत. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने 20 मे रोजी या प्रकरणात एक मोठा निर्णय दिला.

हायकोर्टाने राज्य सरकारला नोडल अधिकाऱ्यांमार्फत बिल भरण्यावर काम करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरुन खासगी रुग्णालयांकडून रुग्णांकडून मनमानी पैसे वसूल करता येणार नाहीत. न्यायमूर्ती सी. प्रवीण कुमार आणि न्यायमूर्ती ललिता कन्नेगंती यांच्या खंडपीठाने आंध्र प्रदेशातील कोरोनाच्या परिस्थितीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना ही सूचना दिली. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान, राज्यांना एकतर खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर लगाम घालण्याचे आदेश दिले होते किंवा अधिक सरकारी रुग्णालये राज्यांमध्ये उघडण्याचे निर्देश दिले होते.

त्याचप्रमाणे भाजपचे आमदार धीरेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांना पत्र लिहिले आहे. आमदाराने पत्रात लिहिले आहे की, या आपत्तीच्या वेळी खासगी रुग्णालयांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली का? आणि जर नसेल तर मग सरकारने या खासगी रुग्णालयांना त्यांचे सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, त्यांचे नीतिशास्त्र जागृत करण्यासाठी आणि नैतिकतेने वागण्यास का भाग पाडू नये? आमदार धीरेंद्र सिंह यांनीही उच्चस्तरीय समिती गठित करून सर्व खासगी रुग्णालयांच्या ऑडिटची मागणी केली होती. या वृत्तानुसार यूपी सरकारनेही राज्यातील काही खासगी रुग्णालयांवर जास्त पैसे आकारल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

मृतदेहांमधून कोरोना पसरू शकतो, कसे केले जावेत अंत्यसंस्कार?

तर रुग्णालय किंवा डॉक्टरांविरूद्ध कशी करावी तक्रार?

हे केवळ बिलाबाबतच नव्हे तर वैद्यकीय दुर्लक्षांबाबतही तक्रारी समोर आल्या आहेत. वैद्यकीयदृष्ट्या कमी सुशिक्षित लोकांना कोणतेही निमित्त देऊन फसवले जाऊ शकते. आपण ज्या पारदर्शक यंत्रणेचा आग्रह करतो त्यामध्ये आपली किती आरोग्य यंत्रणा गुंतलेली आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

देशाच्या घटनेने आपल्याला बरेच काही अधिकार दिले आहेत. प्रश्न विचारण्याच्या अधिकारापासून ते कायदेशीर मार्गाचा वापर करण्यापर्यंत अनेक गोष्टी आपल्याला बहाल करण्यात आल्या आहेत. आता, जर रुग्णालयाकडून आपल्या रुग्णाविषयी योग्य माहिती दिली जात नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी अंधारात ठेवलं जात असेल तर मग आपण नेमकं काय केलं पाहिजे?

लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाला म्हणजे तुम्ही घेतलेला पहिला डोस वाया गेला?

जर आपण अशा परिस्थितीत अडकले असाल तर सर्वप्रथम परिस्थितीचे मूल्यांकन करा. सर्वात आधी हा विचार करा की, खरोखरच रुग्णालय किंवा डॉक्टरांची चूक आहे? बहुतेकदा आपण आपल्य प्रिय व्यक्तींना गमावलेलं असल्याने काय चूक आणि काय बरोबर याचा सारासार विचार करण्याच्या पलीकडे गेलेलो असतो. त्यामुळे आपण अशी काही घटना घडल्यास तात्काळ चिडतो. आपल्याला प्रचंड राग येतो.

आपण अशा परिस्थितीत डॉक्टरांविरूद्ध चुकीचं पाऊल उचलतो. त्यामुळेच सर्वात आधी घडलेल्या घटनेविषयी काही काळ योग्य पद्धतीने विचार करा. जर आपली सारासार विवेकबुद्धी घडलेली घटना डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या चुकीमुळे घडली आहे अशी खातरजमा देत असेल तर आपण कायदेशीररित्या संबंधितांवर कारवाईसाठी पावलं उचलावीत. पण त्याआधी कोणताही आतातायीपणा करु नये. कारण त्यामुळे आपण देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT