ईडीने मागच्या तीन महिन्यात जप्त केले 100 कोटी; जाणून घ्या या पैशांचं पुढे काय होतं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या 3 महिन्यांत तुम्ही अंमलबजावणी संचालनालय (ED) चे नाव अनेक वेळा ऐकले असेल. बंगालमधील पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांचे प्रकरण असो किंवा शनिवारी कोलकात्यातील एका व्यावसायिकाच्या घरावर टाकलेले छापे असोत, सर्वांमध्ये ईडी समान घटक आहे. ईडीच्या या कारवाईबाबत राजकीय पक्षांमध्ये आपापली नाराजी असली तरी येथे या काळात पकडण्यात आलेल्या १०० कोटींच्या रोकडबाबत बोलले जात आहे. ईडी जेव्हा हे पैसे जप्त करते, तेव्हा त्याचे काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर मग जाणून घेऊया नेमकं या पैशांचं काय होतं.

ताज्या केसपासून सुरुवात करूया. शनिवारी, ईडीने कोलकाता येथील एका व्यावसायिकाच्या घरातून 17 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम मोबाईल गेमिंग अॅपद्वारे जमा केल्याचा आरोप व्यावसायिकावर आहे. एवढी रोकड मोजण्यासाठी बँकेच्या 8 कर्मचाऱ्यांना तासनतास कसरत करावी लागली. 8 मशीनद्वारे पैसे मोजण्याचं काम सुरु होतं.

जेव्हा ईडीने सर्वात मोठी जप्त केली

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काही आठवडे मागे जाऊया. जेव्हा ईडीने त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा टाकला. पश्चिम बंगाल सरकारचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी शिक्षक भरती घोटाळ्यात अडकले असताना, ईडीने त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरातून सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. ते मोजण्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. परिस्थिती अशी होती की नोटा मोजण्याचे काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली आणि याच्या काही दिवसांपूर्वी झारखंड खाण घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ईडीने २० कोटींची रोकडही जप्त केली होती. याशिवाय सोने-चांदी, दागिने, हिरे आदी जप्त करण्यात आले होते.

जप्त केलेल्या रोकडचे ईडी काय करते?

ADVERTISEMENT

आता प्रश्न असा आहे की ईडी इतके पैसे पकडते, मग त्याचं काय करते? कायद्यानुसार ईडीला पैसे जप्त करण्याची परवानगी आहे, हे पैसे त्यांच्या वैयक्तिक खात्यात (पीडी) देखील जमा केले जातात, परंतु तो पैसे ते वापरू शकत नाही. किंबहुना, जप्तीनंतर आरोपीला पैशाचा स्रोत आणि कायदेशीर कमाईचा पुरावा देण्याची संधी दिली जाते. जोपर्यंत यासंबंधीचा खटला सुरू आहे तोपर्यंत ही रोकड ईडीकडे पडून असते.

ADVERTISEMENT

जर आरोपीने त्याचे उत्पन्नाचे स्रोत सिद्ध केले आणि न्यायालयाने त्याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली तर त्याला ही रक्कम मिळते. दुसरीकडे, तो असे करण्यात अयशस्वी झाल्यास, ही रक्कम चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशाच्या कक्षेत ठेवली जाते. मात्र, त्यानंतरही ईडी या रकमेवर दावा करत नाही. आधी जाणून घेऊया की, ईडी कोणतीही रोकड कशी जप्त करते?

प्रत्येक नोटेचं तपशील रेकॉर्ड केलं जातं

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत छाप्यात पकडलेली रोकड जप्त करतात. ईडी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अधिकाऱ्यांना जप्तीसाठी बोलावतात. त्यांच्या उपस्थितीत रोख रक्कम मोजली जाते. मोजणी पूर्ण झाल्यानंतर, एक यादी तयार केली जाते, ज्याला जप्ती मेमो म्हणतात. यामध्ये एकूण वसूल केलेल्या रकमेची नोंद असते. यासोबतच 2000 च्या किती नोटा, 500 च्या किती, 200 च्या किती आणि 100 च्या किती नोटा आहेत याचीही नोंद केली जाते. हे असेच आहे की जेव्हा तुम्ही बँकेत रोख जमा करण्यासाठी जाता तेव्हा स्लिपवर नोटांची संख्या टाकतात.

यानंतर, स्वतंत्र साक्षीदाराच्या उपस्थितीत ही रोकड बॉक्समध्ये भरली जाते आणि सील केली जाते. ही रोकड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत पाठवली जाते. जिथे ती ईडीच्या खात्यात जमा केली जाते. एक प्रकारे हे खाते केंद्र सरकारची तिजोरी आहे. ना ईडी, ना बँक किंवा सरकार हे पैसे वापरू शकत नाही. जप्तीचा मुख्य उद्देश आरोपींना तात्काळ वापरण्यापासून परावृत्त करणे हा आहे.

जप्त केलेल्या रकमेवर कोणाचा दावा?

जप्तीनंतर, ईडी तात्पुरत्या जप्तीचे आदेश जारी करते. मग या जप्तीची पुष्टी होते. या रोख रकमेचा आणि उत्पन्नाचा स्रोत सांगण्यास आरोपी असमर्थ ठरल्यास, या रकमेवर केंद्र सरकारचा दावा असतो आणि ती रक्कम केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT