ईडीने मागच्या तीन महिन्यात जप्त केले 100 कोटी; जाणून घ्या या पैशांचं पुढे काय होतं?

मुंबई तक

गेल्या 3 महिन्यांत तुम्ही अंमलबजावणी संचालनालय (ED) चे नाव अनेक वेळा ऐकले असेल. बंगालमधील पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांचे प्रकरण असो किंवा शनिवारी कोलकात्यातील एका व्यावसायिकाच्या घरावर टाकलेले छापे असोत, सर्वांमध्ये ईडी समान घटक आहे. ईडीच्या या कारवाईबाबत राजकीय पक्षांमध्ये आपापली नाराजी असली तरी येथे या काळात पकडण्यात आलेल्या १०० कोटींच्या रोकडबाबत बोलले जात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या 3 महिन्यांत तुम्ही अंमलबजावणी संचालनालय (ED) चे नाव अनेक वेळा ऐकले असेल. बंगालमधील पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांचे प्रकरण असो किंवा शनिवारी कोलकात्यातील एका व्यावसायिकाच्या घरावर टाकलेले छापे असोत, सर्वांमध्ये ईडी समान घटक आहे. ईडीच्या या कारवाईबाबत राजकीय पक्षांमध्ये आपापली नाराजी असली तरी येथे या काळात पकडण्यात आलेल्या १०० कोटींच्या रोकडबाबत बोलले जात आहे. ईडी जेव्हा हे पैसे जप्त करते, तेव्हा त्याचे काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर मग जाणून घेऊया नेमकं या पैशांचं काय होतं.

ताज्या केसपासून सुरुवात करूया. शनिवारी, ईडीने कोलकाता येथील एका व्यावसायिकाच्या घरातून 17 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम मोबाईल गेमिंग अॅपद्वारे जमा केल्याचा आरोप व्यावसायिकावर आहे. एवढी रोकड मोजण्यासाठी बँकेच्या 8 कर्मचाऱ्यांना तासनतास कसरत करावी लागली. 8 मशीनद्वारे पैसे मोजण्याचं काम सुरु होतं.

जेव्हा ईडीने सर्वात मोठी जप्त केली

काही आठवडे मागे जाऊया. जेव्हा ईडीने त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा टाकला. पश्चिम बंगाल सरकारचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी शिक्षक भरती घोटाळ्यात अडकले असताना, ईडीने त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरातून सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. ते मोजण्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. परिस्थिती अशी होती की नोटा मोजण्याचे काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली आणि याच्या काही दिवसांपूर्वी झारखंड खाण घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ईडीने २० कोटींची रोकडही जप्त केली होती. याशिवाय सोने-चांदी, दागिने, हिरे आदी जप्त करण्यात आले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp