‘आदित्य ठाकरे छोटा पप्पू’; अब्दुल सत्तारांच्या विधानावर शिंदे-ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय?

मुंबई तक

टाटा एअरबस प्रोजेक्टवरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलीये. आदित्य ठाकरेंनी हा प्रोजेक्ट जाण्याला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला. सत्तारांच्या या विधानावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या प्रतिक्रिया समोर आल्यात. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट पाठोपाठ टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्यानं राज्यातील शिंदे-फडणवीस […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टाटा एअरबस प्रोजेक्टवरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलीये. आदित्य ठाकरेंनी हा प्रोजेक्ट जाण्याला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला. सत्तारांच्या या विधानावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या प्रतिक्रिया समोर आल्यात.

वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट पाठोपाठ टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्यानं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या टीकेचं धनी ठरलंय. त्यावरूनच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारमुळे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचा आरोप केला. ठाकरेंनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘आदित्य ठाकरेंनी टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला? तारीख कोणती होती? हे पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळी त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. जे बोलताहेत ते कॅबिनेट मंत्री होते. मग प्रकल्पात देवाण घेवाण झाली नाही म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेला?”, अशी शंका उपस्थित करत सत्तारांनी ठाकरे सरकारवरच गंभीर आरोप केला.

पुढे सत्तार असंही म्हणाले, “छोटा पप्पू पहिले बोलले असते, तर आज ही वेळ आली नसती. २०२१ मध्ये प्रकल्प गुजरातला गेला. हे सर्व पाप २०२१ मधलं आहे. एकनाथ शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले. संभ्रमाचं वातावरण बनवायचं असं राजकारण केलं तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल, हे सर्वांना माहितीये”, असं सत्तार म्हणाले होते.

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी काय म्हणाल्या?

अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला. त्यावर बोलताना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी म्हणाल्या, “हे त्यांचं (अब्दुल सत्तार) मत असू शकतं, पण ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे बोलताहेत. सगळ्यांवर ताशेरे ओढताहेत. ज्यापद्धतीचं विधान आहे, ते दुर्दैवी आहे. जेव्हा तुम्ही लढाई लढता, तेव्हा ती हिंमतीने लढाईची असते. तुम्ही खोके खोके म्हणून चिडवत असाल, तर निश्चितच ज्या लोकांचं आयुष्य शिवसेनेत गेलं. अनेक नेत्यांनी शिवसेना उभी केली. त्यांना असं बोललं जात असेल, तर निश्चितच प्रतिक्रिया येणारच आहे”, अशी भूमिका खासदार भावना गवळी यांनी मांडली.

छोटा पप्पू म्हणणं कितीपत योग्य असा प्रश्न भावना गवळींना विचारला गेला, त्यावर त्या म्हणाल्या “याबद्दल तुम्ही साहेबांना (एकनाथ शिंदे) विचारा.”

“आदित्य ठाकरे छोटा पप्पू”; सत्तारांच्या विधानावर वरुण सरदेसाई काय म्हणाले?

युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी अब्दुल सत्तारांवर टीका केली. “आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणं हे फार दुर्दैवी आहे. ओला दुष्काळ असताना सरकार मदत करत नाही. वैयक्तिक टीका टिप्पणी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही”, असं वरूण सरदेसाई म्हणालेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp